माता जिजाऊ, सावित्रीबाई, अहिल्याबाई, ताराराणी आणि यांच्यासारख्या असंख्य कर्तबगार, पुरोगामी विचारांच्या महिलांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात आजपर्यंत मुख्यमंत्री पदी महिला विराजमान होऊ शकली नाही. आता जेव्हा लाडकी बहिण योजना आणलीच आहे तेव्हा एखाद्या लाडक्या बहिणीला ही संधी मिळणार का? असा विषय आता चर्चेत आला आहे. मग कोण होणार मुख्यमंत्री? लाडका भाऊ की लाडकी बहीण? हे मात्र महाराष्ट्राची जनताच ठरवणार आहे.