मुंबई विद्यापीठ निवडणूक २४ सप्टेंबरला होतेय. दोनदा पुढे ढकललेल्या निवडणूकीत युवासेनेला अर्थात तिची पालक असलेल्या शिवसेनेला बाजी मारू देऊ नये असा सरकारचा प्रयत्न होता. मात्र उच्चन्यायालयानेच कान उपटल्यावर विद्यापीठाच्या प्रशासनाचे धिंडवडे निघालेत आणि सरकारचंही हसं झालेय. या निवडणूकीचा राजकीय खेळखंडोबा करणारे निकालानंतर तोंडावर पडतील.