Monday, September 30, 2024

Latest Posts

राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक संपन्न, घेतले तब्बल ३८ मोठे निर्णय!

आगामी विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election 2024) आता फक्त काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून आता सर्वच पक्ष त्याबाबत कसून तयारीला लागले आहे. राज्यातील महायुती सरकारसुद्धा (Mahayuti Government) सध्या ऍक्शन मोडमध्ये असून राज्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात येत आहे. राज्यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महायुती सरकारकडून अनेक महत्वाचे निर्णय घेणे जात आहेत. अश्यातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज (सोमवार, ३० सप्टेंबर) मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील इत्तर सदस्य यावेळी उपस्थित होते. राज्य सरकारकडून कामांचा धडक लावण्यात येत असून आता झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३८ मोठे निर्णय घेण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यावेळी सरकारने देशी गायींना राज्यमातेचा दर्जा दिल्याचे स्पष्ट झाले आहे, तसेच, ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा ८ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मंत्रिमंडळ निर्णय खालीलप्रमाणे :

  1. कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ. अनुकंपा धोरणही लागू
  2. ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा ८ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान
  3. ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देणार.
  4. एमएमआरडीएला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता
  5. ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती देणार. १२ हजार २०० कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता
  6. ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गासाठी १५ हजार कोटी कर्जरूपाने उभारणार
  7. देशी गाईंच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना.
  8. भारतीय खेळ प्राधिकरणाला आकुर्डी, मालाड व वाढवण येथील जागा. नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार
  9. रसायन तंत्रज्ञान संस्थेस ठाणे येथील मौजे खिडकाळीची जागा
  10. राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापणार. जलस्त्रोतांचे उत्तम नियोजन करणार
  11. जळगाव जिल्ह्यातल्या भागपुर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता. ३० हजार हेक्टर जमीन सिंचित होणार
  12. लातूर जिल्ह्यातील हासाळा, उंबडगा, पेठ, कव्हा कोल्हापूर बंधाऱ्याच्या कामास मान्यता
  13. धुळ्याच्या बीएपीएस स्वामीनारायण संस्थेस ग्रामस्थांच्या विकासासाठी जमीन
  14. रमाबाई आंबेडकर नगर, कामराजनगरच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती देणार. एमएमआरडीए ला जमीन अधिमूल्य भरण्यास सवलत
  15. केंद्राच्या मिठागराच्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करणार. दुर्बलांसाठी घरांच्या योजनांना वेग येणार
  16. पालघर जिल्ह्यातील मुरबे येथे बहुउद्देशीय बंदर प्रकल्प. जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर विकासक
  17. धारावीतल्या अपात्र झोपडीधारकांसाठी परवडणारी भाडेतत्त्वावरील घरे योजना; धारावी पुनर्वसन प्रकल्पावर जबाबदारी
  18. सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवून २० लाख
  19. अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवले; अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ होणार
  20. सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ
  21. जामखेडच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सूत गिरणीला अर्थसहाय्य करणार
  22. राज्यातील होमगार्डांच्या भत्त्यात भरीव वाढ. सुमारे ४० हजार होमगार्डना लाभ
  23. नाशिकचे वैद्यकीय पदवी महाविद्यालय व रुग्णालय शासनाच्या अखत्यारीत घेणार
  24. आयुर्वेद, युनानी महाविद्यालयातील पदभरतीसाठी निवड समिती
  25. राज्यातील आणखी २६ आयटीआय संस्थांचे नामकरण
  26. आर्य वैश्य समाजासाठी श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ
  27. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवरील सदस्यांची संख्या वाढवून १५
  28. अधिसंख्य कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा तांत्रिक खंड क्षमापित
  29. बार्टीच्या धर्तीवर ‘वनार्टी’ स्वायत्त संस्था
  30. मेट्रो तीन प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुद्रांक शुल्कात सवलतजिल्हा परिषदेतील २००५ नंतर रुजू कर्मचाऱ्यांना एक वेळ पर्याय
  31. पंचगंगा नदी प्रदूषणासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्यावत करणार
  32. राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती. ४८६० पदे
  33. शासन हमी शुल्काचा दर कमी करण्याचा निर्णय. हमी शुल्क माफी मिळणार नाही
  34. अवयवदान व अवयव प्रत्यारोपणासाठी यंत्रणा. जनजागृतीवर भर
  35. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा तिसरा अहवाल स्वीकारला
  36. राज्यातील सैनिकी शाळांसाठी आता सुधारित धोरण.
  37. डाळिंब, सीताफळ इस्टेट उभारणार उत्पादकांना मोठा लाभ
  38. महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी मुद्रांक अधिनियमात सुधारणा
हे ही वाचा:

सिनेट निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही असाच विजय मिळवायचा आहे: Aaditya Thackeray

संविधानावरचा धोका अद्याप टळला नाही हे Prakash Ambedkar यांना सांगायची गरज नाही: Sanjay Raut

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss