Thursday, July 4, 2024

Latest Posts

त्वरा करा विद्यार्थ्यांसाठी ‘अच्छे दिन’ ; शिक्षणासाठी आणली ‘ही’ नवी शिष्यवृत्ती

महाराष्ट्र शासनामार्फत विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना दिले जातात दहावी झाल्यानंतर दहावी मध्ये चांगले गुण मिळवणे विद्यार्थ्यांना दहा हजारापासून ते एक लाख रुपये पर्यंत शिष्यवृत्ती महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवर उपलब्ध आहेत.महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवर जाऊन तुम्ही सविस्तर शिष्यवृत्ती विषयीची माहिती घेऊ शकता आपण आज महाराष्ट्र शासनाच्या अशाच एक शिष्यवृत्ती बद्दल पाहणार आहोत ते शिष्यवृत्ती म्हणजे एकलव्य स्कॉलरशिप (Eklavya Scholarship).

१० वी, १२ वी व पदवीधर शिक्षण झाले आहे आणि पुढे खूप शिकायचंय.आवडत्या ज्ञानशाखेत प्रवेश करायचा आहे. पण परिस्थितीमुळे एवढं पैसे भरणे शक्य होत नाही. त्याचप्रमाणे तो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी हुशार आहे. शिकण्याची इच्छा असूनसुद्धा केवळ पैशाअभावी अनेक विद्यार्थ्यानं पुढे शिकता येत नाही. त्यांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी देशाला एक चांगला नागरिक देण्यासाठी आता शासन वेगवेगळ्या उपाययोजना आखते. प्रत्येक देशाच्या शासन व्यवस्थेत प्रत्येक विध्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती, फ्रीशिप आणि फेलोशिप दिली जाते.

त्याच प्रमाणे आपल्या देशात सुद्धा शासन अशा हुशार विद्यार्थ्यांना पुढे आणण्यासाठी शासन अशा पद्धतीच्या अनेक उपाययोजना खास देशातील मुलांनसाठी राबवत असते. महाराष्ट्र शासनामार्फत विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना दिले जातात दहावी झाल्यानंतर दहावी मध्ये चांगले गुण मिळवणे विद्यार्थ्यांना दहा हजारापासून ते एक लाख रुपये पर्यंत शिष्यवृत्ती महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवर उपलब्ध आहेत. महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवर जाऊन विद्यार्थी सविस्तर माहिती शिष्यवृत्ती विषयीची  घेऊ शकता आपण आज महाराष्ट्र शासनाच्या अशाच एक शिष्यवृत्ती बद्दल पाहणार आहोत ते शिष्यवृत्ती म्हणजे एकलव्य स्कॉलरशिप (Eklavya Scholarship).

शासनाने राबवलेल्या योजनेचे नाव एकलव्य स्कॉलरशिप असे असून डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन(Director of Higher Education) अंतर्गत ही शिष्यवृत्ती (Eklavya Scholarship) दिली जाते ही शिष्यवृत्ती पदवी धारण केलेल्या उमेदवाराला पदव्युत्तर शिक्षणासाठी दिली जाते पदवी मध्ये कमीत कमी ६०% गुण असेल तर अश्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळते. या शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थ्याला पदवीमध्ये चांगले गुण असणे आवश्यक आहे तुमची पदवी आर्ट, कॉमर्स किंवा कायद्यामध्ये झाली असेल तर त्यासाठी ६० टक्के व सायन्स मध्ये झालेल्या असेल तर ७० टक्के गुण विद्यार्थ्याला असणे आवश्यक आहे. यासोबतच विद्यार्थी महाराष्ट्राचे रहिवासी असतील तर त्या विद्यर्थ्यांनाही स्कॉलरशिप मिळत असते या स्कॉलरशिप मध्ये भाग घेण्यासाठी तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न हे ७५००० पेक्षा जास्त नसावं तसेच विद्यार्थी हा कुठे पार्ट टाइम किंवा फुल टाइम जॉब करणारा नसावा.

साधारण या शिष्यवृत्ती मधून एकूण किती रक्कम मिळते :

महाराष्ट्र शासनाच्या ७ फेब्रुवारी १९९६ च्या शासन निर्णयानुसार (Eklavya Scholarship) पाच हजार रुपये एवढी शिष्यवृत्तीत  निवड झालेल्या उमेदवाराला दिली जाते ही निवड मेरिट लिस्टवर केली जाते.

शिष्यवृत्तीसाठीची एकूण पात्रता :

  • शासन निर्णय ७ जुलै १९९६, शासन निर्णय ५ फेब्रुवारी २००४ नुसार ज्या उमेदवाराचे पदवीचे शिक्षण कायदा, कॉमर्स किंवा आर्ट मध्ये ६० % गुणासह झालेल्या असेल तसेच विज्ञान मध्ये ७०% पर्यंत गुण असणे गरजेचे असेल.
  • पालकाचे उत्पन्न तसेच अर्जदाराचे उत्पन्न मिळून ७५ हजार एवढे वार्षिक उत्पन्न (Annual Income) असणं आवश्यक आहे.
  • अर्जदार हा महाराष्ट्रातला नागरिका असावा लागतो.
  • अर्जदार कुठेही पार्ट टाइम किंवा फुल टाइम जॉब करत नसावा.
  • महाराष्ट्रातला विद्यार्थी असेल आणि महाराष्ट्राच्या बाहेर जर शिक्षण घेत असेल तर अशा विद्यार्थ्याला ही स्कॉलरशिप मिळणार नाही.

शिष्यवृत्तीसाठी लागणारी महत्वपूर्ण कागतपत्रे :

  • वार्षिक उत्पन्नाचा दाखला तहसीलदाराने दिलेला
  • मागच्या वर्षाचे गुणपत्रक
  • अधिवास प्रमाणपत्र

अधिकृत संकेतस्थळ :

https://mahadbt.maharashtra.gov.in

अर्ज करण्याचे अधिकृत संकेतस्थळ :

https://mahadbt.maharashtra.gov.in/SchemeData/SchemeData?str=E9DDFA703C38E51AB0BE07C3EC756406

वर दिलेली कागदपत्रे तसेच आवश्यक पात्रता तुम्ही धारण करत असाल तर सरकारतर्फे ही स्कॉलरशिप तुम्हाला दिली जाते या स्कॉलरशिपसाठी वर लिंक दिलेले आहे. त्या लिंक वर जाऊन विद्यार्थी सविस्तर माहिती घेऊ शकतात आणि या योजनेसाठी नोंदणी करून विद्यार्थी अर्ज सुद्धा सादर करू शकतात. अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थी अर्ज करू शकत आहेत. त्याशिवाय अर्ज करण्याचे संकेत स्थळ सुद्धा वर दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याचा संपूर्ण लाभ घ्यावा.

हे ही वाचा

आता शेतकऱ्याची आर्थिक विवंचना होणार दूर; BACCHU KADU यांनी दिला ‘हा’ निर्णय

NEET PAPER LEAK 2024 : नीट पेपर फुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss