Worli मधील Hit & Run case संदर्भात अभिनेते जयवंत वाडकर यांनी केला संताप व्यक्त, म्हणाले…

सध्या संपूर्ण राज्यात एकच मुद्दा चांगला गाजत आहे आणि तो म्हणजे ‘हिट अँड रन’. वरळीत रविवारी पहाटे झालेले ‘हिट अँड रन’चे प्रकरण चांगलेच गाजत आहे.

Worli मधील Hit & Run case संदर्भात अभिनेते जयवंत वाडकर यांनी केला संताप व्यक्त, म्हणाले…

सध्या संपूर्ण राज्यात एकच मुद्दा चांगला गाजत आहे आणि तो म्हणजे ‘हिट अँड रन’. वरळीत रविवारी पहाटे झालेले ‘हिट अँड रन’चे प्रकरण चांगलेच गाजत आहे. या अपघाताला आता ४८ तास उलटून गेले तरी मुख्य आरोपी मिहीर शाह याला शोधण्यात, अटक करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. शिवसेना शिंदे गटाचे नेते राजेश शाह हे त्याचे वडील असून अपघातानंतर त्यांनीच मुलाला पळून जाण्यास सुचवले आणि ड्रायव्हरला अपघाताचा आळ घेण्यास सांगितले. या सगळ्या घटनेमुळे संताप व्यक्त होत असून एका महिलेचा नाहक जीव घेणाऱ्या त्या आरोपीला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी करण्यात येत आहे. या घटनेबाबत वारंवार नवनवीन अपडेट हे समोर येत आहेत. तर आता या संदर्भात मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांनी संताप व्यक्त करत आपले मत मांडले आहे.

वरळीतील हिट अँड रन प्रकरणात मच्छी आणण्याठी गेलेल्या कोळी दांपत्याला एका बीएमडब्ल्यूने उडवले. वरळी कोळीवाडा परिसरात राहणारे नाकवा दांपत्य हे सकाळी ससून डॉकला मच्छी आणण्यासाठी गेले होते. मच्छी घेऊन परतत असताना एका चारचाकीने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. या दुर्घटनेत कावेरी नाखवा (वय ४५) यांचा मृत्यू झाला तर त्यांचे पती प्रदीप गंभीर जखमी झाले. कावेरी ही अभिनेते जयवंत वाडकर यांची बहीण असून त्यांच्या मृत्यूमुळे त्यांना तीव्र दु:ख झाले आहे. ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांनी टीव्ही ९ यांच्याशी संवाद साधला आहे. माझी शासनाला विनंती आहे कि त्याला पकडा. लोकांचा माज वाढला आहे. पोलिसांची दहशत कमी झालीय, पूर्वीसारखी राहिली नाही असं मला वाटतंय. लोक त्यांना घाबरत नाहीत, अशा शब्दांत वाडकर यांनी भावना मांडल्या. कायद्याचा उरेलला धाक नाही. पोलीस तत्पर असतात, ते काम करतात. पण कायदा आणखी सॉलिड करता येईल याकडे लक्ष दिल पाहिजे. पैशाने लोकांची मानसिकता बदलली आहे. अनेकांचा हस्तक्षेप असतो तो थांबला पाहिजे. पोलिसांना 24 तास दिले तर पोलीस सगळे गुंड २४ तासात आत टाकू शकतात असा माझा विश्वास आहे… पोलीस करू शकतात पण त्यांना साथ दिली पाहिजे, असेही वाडकर म्हणाले.

 

तसेच वाडकर पुढे म्हणाले आहेत की, ‘ आपण गाडी चालवताना साधा उंदीर जरी समोर आला तरी आपण डगमगतो, गाडी इकडे तिकडे होते. आणि इथे ( या घटनेत) समोर अख्खा जिवंत माणूस आलाय तरी तुम्ही त्याला उडवताय हे किती निर्दयी आहे ‘ असा शब्दांत जयवंत वाडकर यांनी उद्वेग व्यक्त केला. उद्दामपणा आणि पैशाचा माज थांबला पाहिजे, असल्या लोकांना फटके दिल्याशिवाय पर्याय नाही असे म्हणत या घटनेतील आरोपीला लवकरात लवकर अटक करून शिक्षा दिली पाहिजे अशी मागणी वाडकर यांनी केली. राज्यात हिट अँड रनच्या अनेक घटना गेल्या काही महिन्यात घडत आहेत. पुण्यातील घटनेत दोन तरूण जीवांनी आयु्ष्य गमावलं, राज्यात आणखीही अशाच घटना घडल्या, ते ऐकूनचं कसंतरी वाटतं होतं. आणि काल ( रविवार पहाटे) घडलेली घटना तर माझ्या नातेवाईकांशी निगडीतच होती. कावेरी माझी बहीण होती, तिच्या मृत्यूमुळे मोठा धक्का बसला आहे. माझं शूटिंग आणि नाटकाचा प्रयोग असल्यामुळे मी शेवटच्या दर्शनाला जाऊ शकलो नाही, पण माझा मुलगा, छोटा भाऊ तिकडे गेले होते, तिला बघवतही नव्हतं,असं सांगताना वाडकरांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

गद्दार लोकांच्या सेनेमुळे अशा घटनांना वाव, म्हणून Mumbai तुंबते, काय म्हणाले Ambadas Danve?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version