Sunday, July 7, 2024

Latest Posts

मराठमोळा अभिनेता किरण माने करणार ठाकरे गटात प्रवेश,हाती बांधणार शिवबंधन

छोट्या पडद्यावरील 'मुलगी झाली हो' या मालिकेतून किरण माने घराघरात पोहचले,त्यानंतर बिग बॉस मराठीतून ते प्रसिद्धी झोतास आले,कारण बिग बॉसमध्ये त्यांचे भारदस्त बोलणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत होत

मराठमोळा अभिनेता किरण माने हा नेहमीच कोणत्यान कोणत्या कारणांमुळे सतत चर्चेत येत असतो.कधी त्याच्या वैयक्तिक गोष्टीमुळे तर कधी वादग्रस्त मुद्द्यांवर भाष्य केल्यामुळे चर्चेचा विषय ठरत असतात. छोट्या पडद्यावरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून किरण माने घराघरात पोहचले,त्यानंतर बिग बॉस मराठीतून ते प्रसिद्धी झोतास आले,कारण बिग बॉसमध्ये त्यांचे भारदस्त बोलणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत होत.दरम्यान मागे किरण माने हे मराठा आरक्षणाला धरुन देखील प्रचंड चर्चेत आले होतं.आता पुन्हा एकदा किरण माने चर्चेत आले आहेत.ते म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गटात ते प्रवेश करणार आहेत. 

किरण माने हे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश करणार आहे.तर ते आपल्या हातात शिवबंधन बांधून घेणारं आहेत. काही महिन्यांपूर्वी भाजप विरोधात भूमिका घेत असल्याने आपल्याला एका मनोरंजनक करणाऱ्या वाहिनीतून काढल्याचा माने यांनी आरोप केला होता. आता सुषमा अंधारे यांच्या माध्यमातून किरण माने ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

शिवसेना गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी आज अनेक महत्त्वाचे पक्षप्रवेश होणार आहेत. बीडमधील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे ठाकरे गटात प्रवेश होणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना घाटकोपर उपविभाग अध्यक्ष निलेश जंगम यांचा ठाकरे गटात जाहीर प्रवेश होणार आहे. त्यांच्यासोबत काही मनसेचे कार्यकर्तेदेखील शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करतील. तसेच मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते किरण मानेदेखील आज मातोश्रीवर पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

किरण माने ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत विलास पाटील हे पात्र साकारत होते. अभिनयासह ते सोशल मीडियाच्या माध्यमातून बेधडकपणे भाष्य करत असतात. ‘मुलगी झाली हो’ दरम्यान त्यांनी केलेली राजकीय पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती. त्यानंतर त्यांना मालिकेतून त्यांना बोहेर काढण्यात आलं. त्यावेळी राजकीय दबावातून वाहिनीनं मालिकेतून काढलं, या पोस्टमुळे ट्रोल करण्यात आलं त्यानंतरच मालिकेतून काढलं असल्याचा आरोप किरण माने यांनी केला होता. 

किरण माने सोशल मीडियाच्या माध्यमातून वेळोवेळी राजकीय भूमिका मांडत असतात. ‘सातारचा बच्चन’ अशी किरण माने यांची ओळख आहे. सोशल मीडियावरुन जहरी टीका करणारे किरण माने सध्या ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आहेत. सिंधुताई सपकाळ यांच्या आयुष्यावर आधारित ही मालिका आहे.दरम्यान आता कलाकार मंडळींचा देखील राजकारणात वळण्याचा कल वाढताना दिसून येत आहे.

हे ही वाचा:

मुंबईच्या कोस्टल रोडचे जानेवारी अखेरपर्यंत काम होणार पूर्ण, मुख्यमंत्र्यांनी सांगितली उदघाटनाची वेळ

 उदयपुरमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडणार आयरा-नुपुरचा शाही विवाहसोहळा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss