मुंबई : बॉलिवूड ची सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि सलमान खानच्या यांच्या अफेअर्सच्या बातम्या चर्चेत राहिल्या. 1999 मध्ये संजय लीला भंसाळीयांचा आलेला ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटादरम्यान सलमान खानचे आणि ऐश्वर्याचे प्रेमप्रकरण पुढे आले. त्यादरम्यान सगळ्यांनात्यांच्याबाबतीत काय होतंय हे जाऊन घ्यायची उत्सुकता होती, जी अजूनही कायम आहे. सलमान खान आणि ऐश्वर्या रायच्या संबंधित अनेक बातम्या समोर आल्या होत्या. परंतु सलमान आणि ऐश्वर्या यांच्या सततच्या येणाऱ्या बातम्यांमुळे ऐश्वर्याचे आईवडील हैराण झाले होते. ऐश्वर्याचे वडील नाराज होते. परंतु ऐश्वर्या तेव्हा सलमान सोबत होती.
हेही वाचा :
पायांना वाचवा फंगल इन्फेक्शनपासून.
ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांची जोडी प्रेक्षकांना देखील खूप आवडत होती. त्यांच्या अफेअर्स च्या चर्चा या येत जात होत्या. हेसगळं सुरु असताना अशातच ऐश्वर्या राय आणि सलमान खान वेगळे होतायत ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरत गेली. एका न्यूज आणि वर्तमान पात्राला दिलेल्या मुलाखतीनुसार असे समोर आले कि, ऐश्वर्याने सांगितले. सलमान खान माझ्यावर संशय घ्यायचा पण खरंतरसलमान खान हा मला फसवतं होता. त्याने इन्डायरेक्ट्ली तसे कबूलही केले होते. म्हणून या सगळ्यानंतर ऐश्वर्या राय ने सलमान सोबतन राहण्याचा निर्णय घेतला. परंतु एवढ्या वर्षानंतर ऐश्वर्याच्या बोलण्यात सलमानचे नाव आले आहे.
एका मुलाखती दरम्यान ऐश्वर्याला विचारण्यात आले कि, ‘मोहोब्बते’ मध्ये तिची आणि “शाहरुख” खान आणि तिची जोडी फार कमी वेळेसाठी दाखवण्यात आली होती. पण हि जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. पण जोश चित्रपटामध्ये ती शाहरुख खान ची बहीण होती. याबाबत तिला विचारलं असता ऐश्वर्या म्हणाली मला सुरवातीपासून मंसूर सोबत काम करायचे होते, सुरवातीला “आमिर खान” आणि “सलमान खान” ला यामध्ये कास्ट केले होते. परंतु नंतर ते बदलण्यात आले. या संवादातकाही सेकंदासाठी ऐश्वर्याने सलमान खानचे नाव घेतले होते. पण खूप वर्षांनी सलमान खानचे नाव ऐश्वर्याच्या बोलण्यात ऐकून सगळ्यांना आनंद झाला. ऐश्वर्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.