spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘ज्यांनी मारले नाकर्तेपणावर बाण’,….अमृता फडणवीसांनी उखाणा घेत विरोधकांवर साधला निशाणा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच कोणत्यान कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असतातच.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच कोणत्यान कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असतातच.कधी त्यांच्या बिनधास्त आणि रोखठोक वक्तव्यामुळे तर कधी त्यांच्या वैयक्तिक किंवा प्रोफेशनल कामामुळे ते चर्चेचा भाग होतचं असतात.अमृता फडणवीस या त्याच्या गाण्याच्या शैलीतून त्यांच्या चाहत्यांचे नेहमीच मनोरजंन करत असतात.सध्या देखील त्या एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे चर्चेत आल्या आहेत.त्यामध्ये त्यांनी उखाणा घेत विरोधकांवर सोडलेला बाण गा सरळ सरळ समजुन येणारा आहे आणि खुप काही सांगुन देखील जातो.

अमृता फडणवीस या सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात.ते त्यांचे अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात.अमृताजी या कधी त्यांच्या गाण्यातून तर कधी इंस्टावरील रिल्समधून चाहत्यांचे मनोरजंन करतात,अमृताजी यांचा चाहता वर्ग देखील बराच मोठा असल्याने त्यांच्या प्रत्येक पोस्टला लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो.अमृता फडणवीस जरी गायिका असल्या तरी त्यांच्या पोस्ट मधून कधी कधी रोखटोक वक्तव्य करत असतात.त्यामुळे अनेकदा त्यांना ट्रोल देखील केलं जातं असलं.तरी त्यांच्या कलेला प्रेक्षक चांगला प्रतिसाद देतात.

तर सध्या त्यांचा व्हायरल झालेल्या व्हिडिओत त्या उखाणा घेताना दिसून येत आहेत.दरम्यान नागपुरातून अमृताजींनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. त्यातून त्यांनी केलेली राजकीय टोलेबाजी ही राजकीय वर्तुळात चर्चेत आली आहे. अमृताजी आपल्या त्या उखाण्यात म्हणतात, ज्यांनी मारले नाकर्तेपणावर बाण, त्या देवेंद्रजींकडून मी घेऊन आले विकासाचे वाण, आता सगळ्यांनी स्विकारावे एकत्र, आपण महाराष्ट्र करु निर्माण…. अमृताजींचा तो उखाणा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट देऊन त्यांचे कौतुक केले आहे.

यापूर्वी देखील अमृता फडणवीसांनी त्यांच्या भाषणातून विरोधी पक्षांवर कडाडून टीका केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्या चर्चेतही आल्या होत्या. त्या वक्तव्याची महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चाही होती. या सगळ्यात त्यांच्या नव्या उखाण्यानं लक्ष वेधून घेतले आहे.तर नुकतच अमृता फडणवीसांचा एक नवीन गाणं प्रदर्शित झालं त्या गाण्याचे बोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले होते.प्रेक्षकांनी त्या गाण्याला देखील चांगला प्रतिसाद दिला आहे.

हे ही वाचा:

मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर संसदेत लक्ष वेधले, सुप्रिया सुळे

व्हॅलेंटाईन डे निमित्त करण जोहरची ‘लव्ह स्टोरीज’ सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss