Thursday, July 4, 2024

Latest Posts

‘बोलायचं राहून गेलं’ या मराठी चित्रपटाची घोषणा

प्रेमाच्या अप्रकाशित पैलूंवर आधारलेल्या एका नवीन चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. 'बोलायचं राहून गेलं' या चित्रपटात प्रेक्षकांना एक अजब-गजब प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे.

आयुष्यात प्रत्येकाला पहिले प्रेम होते पण ते प्रत्येकाला मिळतेच असे नाही कारण ते ‘बोलायचं राहून गेलं’. असाच सर्वांचा परिचयाचा  एक विषय म्हणजे प्रेम. या प्रेमकथांवर आधारित चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात घेऊन एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजवर प्रेमकथांवर आधारलेल्या बऱ्याच चित्रपटांनी रसिकांचं मनोरंजन करण्यात यश मिळवलं आहे. रसिकांची आवड ओळखून लेखक-दिग्दर्शकांनीही गुलाबी प्रेमाचे वेगवेगळे पैलू रुपेरी पडद्यावर सादर केले आहेत. तरीही प्रेमाची गोडी तसूभरही कमी झालेली नाही. प्रेमाच्या अप्रकाशित पैलूंवर आधारलेल्या एका नवीन चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. ‘बोलायचं राहून गेलं’ या चित्रपटात प्रेक्षकांना एक अजब-गजब प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे.

जिजा फिल्म्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते अभिषेक उत्कर्ष कोळी आणि सुरेश मगनलाल प्रजापती आहेत. निर्मितीसोबतच कथा, पटकथा लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारीही अभिषेक उत्कर्ष कोळी यांनी सांभाळली आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. अभिषेक कोळी यांनी त्यांची मुलगी जिजा हिच्या वाढदिवसाच्या दिवशी या चित्रपटाचा शुभारंभ केला आहे. याप्रसंगी निर्माते, दिग्दर्शक, कलाकारांसोबत तंत्रज्ञही उपस्थित होते. या चित्रपटात अभिषेक कोळी एक अनोखी लव्ह स्टोरी सादर करणार असल्याचं ‘बोलायचं राहून गेलं’ या शीर्षकावरून सहज लक्षात येतं. इतर प्रेमकथांपेक्षा हा चित्रपट वेगळ्या वाटेने जाणारा असल्याचे संकेत शीर्षकावरून मिळतात. शीर्षकाला अनुसरून अभिषेक यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली असून, आजतागायत कधीही समोर न आलेल्या पैलूंचा समावेश केला आहे. दर्जेदार निर्मिती मूल्यांच्या साथीने सुमधूर गीत-संगीताची किनार जोडण्यात आल्याने ‘बोलायचं राहून गेलं’ च्या रूपात प्रेक्षकांना एक संगीतप्रधान प्रेमकथा पाहायला मिळेल असा विश्वास अभिषेक कोळी यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “एक फ्रेश कथानक ‘बोलायचं राहून गेलं’ या चित्रपटात आहे. तरुणाईसोबतच सर्व वयोगटांतील रसिकांना नजरेसमोर ठेवून बनवलेला हा एक परिपूर्ण कौटुंबिक सिनेमा आहे. रोमान्स, कॉमेडी, इमोशन्सचा अद्भूत संगम असलेली अलौकीक प्रेमकथा या चित्रपटाचा प्लस पॉइंट आहे. ‘बोलायचं राहून गेलं’ ची कथा शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवेल”, असेही अभिषेक कोळी म्हणाले.

या चित्रपटात अभिजीत आमकर, गणेश यादव, अरुण नलावडे, उमेश राव, अस्मिता सुर्वे आदी कलाकार आहेत. संगीतकार कुणाल-करण या चित्रपटातील गीतांना संगीत देणार आहेत. निलेश वि. गमरे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता असून संकेत बारे लाइन प्रोड्युसर आहेत. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे.

हे ही वाचा

सुदृढ नागरिक ही राज्याची संपत्ती, म्हणून…INTERNATIONAL YOGA दिनी CM Shinde यांचे आवाहन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss