बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut ) ही तिच्या वक्तव्यांमुळे चांगलीच चर्चेत असते. अभिनेत्री कंगना रणौत ही सोशल मिडीयावर कायम सक्रिय असते. तसेच कंगना रणौत ही अभिनेता सुशांत संग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनांनंतर जास्त चर्चेत आली आहे. कारण अभिनेत्री कंगना रणौत हिने सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर बॉलीवूडबद्दल अनेक खुलासे केले आहे. तसेच कंगना ही कायम बॉलीवूड चित्रपटांच्या विरोधातच भाष्य करताना आढळली आहे. पण आता अभिनेत्री कंगनाने तिच्या ट्विटरच्या अधिकृत खात्यावरून ट्विट करत, चक्क पठाण या चित्रपटाची स्तुती केली आहे. त्यावर एक युजरने कंगनाने केलेल्या ट्विटवर रिट्विट करत कंगनाला ‘धाकड’ चित्रपटाची आठवण करुन दिली आहे.
अभिनेत्री कंगना रणौतने तिच्या ट्विटरच्या अधिकृत खात्यावरून ट्विट करत पठाण (Pathaan) चित्रपटाची स्तुती केली आहे. यावेळेस कंगनाने म्हंटले आहे की पठाण चित्रपटाला एवढा विरोध झाला असून देखील जे लोक दावा करत आहेय की या चित्रपटावर प्रेमाचा विजय झाला. त्या लोकांना कंगनाने सहमती दर्शवली आहे. कंगनाने तिच्या ट्विट मध्ये असे लिहिले आहे की” पठाण द्वेषावर प्रेमाचा विजय असल्याचा दावा करणाऱ्या लोकांशी मी सहमत आहे, होय हे भारताचे प्रेम आहे जिथे ऐंशी टक्के हिंदू राहतात आणि तरीही पठाण या चित्रपटाला प्रतिसाद मिळतो आहे. या कंगनाने केलेल्या ट्विटवर रिट्विट करत एका युजरने तिला तिच्या धाकड या चित्रपटाची आठवण करून दिली आहे. या युजरने त्याच्या ट्विट मध्ये लिहिले आहे की “कंगनाच्या धाकडे चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल ५५ लाख रुपयांची कमाई केली होती. आणि या चित्रपटाचे संपूर्ण बॉक्स ऑफिस कोलेक्शन हे २ कोटी ५८ लाख रुपये होतं.पण पठाण चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०० कोटीची कमाई केली हे पाहून कंगना निराश झाली असेल”. असे लिहीत या युजरने कंगनाला टोला लागवण्याचा प्रयत्न केला आहे.
All those who are claiming Pathan is triumph of love over hate,I agree but whose love over whose hate? Let’s be precise, whose is buying tickets and making it a success?Yes it is India’s love and inclusiveness where eighty percent Hindus lives and yet a film called Pathan (cont)
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 27, 2023
या युजरने केलेल्या ट्विटवर कंगनाने म्हंटले आहे की “हो, ‘धाकड’ हा एक मोठा ऐतिहासिक फ्लॉप चित्रपट होता. ही गोष्ट मी कधीच टाळली नाही. शाहरुख खानचा गेल्या दहा वर्षांमध्ये हा पहिलाच चित्रपट चालला आहे. मीही त्याच्याकडून प्रेरणा घेते. भारताने जशी संधी त्याला दिली तशी आम्हालाही मिळेल अशी मी आशा करते. कारण भारत देश महान आहे. जय श्रीराम”. असे म्हणत कंगनाने या युजरला चांगलेच उत्तर दिले आहे.
हे ही वाचा:
शाहरुख खानसाठी ‘या’ अभिनेत्रीचे हृदय धडधडते, उघडपणे म्हणाली, ‘मला दुसरी पत्नी करा’