बिग बॉस मराठी सिझन ५ (Big Boss Marathi Season 5) हा रिऍलिटी शो सुरु होऊन ४४ दिवस पूर्ण झाले आहेत. बिग बॉसचा खेळ आता सातव्या टप्प्यात म्हणजे सातव्या आठवड्यात येऊन पोहचला आहे. बिग बॉसच्या घरात कधी काय होईल याचा काही अंदाज नाही. या घरातील सदस्यांची नात्याची समीकरणं ही नेहमी बदलताना दिसतात. पुन्हा जान्हवी किल्लेकर आणि आर्या जाधवमध्ये जोरदार वादावादी झाली आहे.
बिग बॉसच्या मराठीच्या घरात पहिल्या दिवसापासूनच सदस्यांमध्ये भांडणं होताना दिसत आहेत. सदस्यांमध्ये मैत्री असताना कधी त्यांचे एकमेकांशी वाद होतील हे सांगणे कठीण आहे. आर्या आणि जान्हवीमध्ये मागील दोन आठवड्यांपासून वाद होत नव्हते. दोघीही एकमेकांशी खूपच चांगल्या पद्धतीने वागत होत्या. पण, आता पुन्हा एकदा त्यांच्या मैत्रीत वादाची ठिणगी पडणार आहे. बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये जान्हवी आणि आर्यामध्ये घराच्या कामांवरून कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे. या नवीन भागात जान्हवी आर्याला म्हणत आहे की, “तुला वॉशरूम साफ करता येत नाही…भांडी घासता येत नाही…करता काय येतं मग तुला”? त्यावर आर्या जान्हवीला म्हणते, “तू स्वतः पहिले क्लीन कर”. जान्हवी पुढे म्हणते, “मला चूक दिसली तर दिसली आर्या. तुला घाणेरड्यासारखं राहायला आवडतं तर घाणेरड्यासारखंच राहा”, असे सुनावते.
बिग बॉसच्या घरात प्रसिद्ध बॉडीबिल्डर संग्राम चौगुलेने बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली आहे. संग्रामची घरात एन्ट्री होताच त्याचे पहिल्याच दिवशी निक्की अरबाजबरोबर खटके उडाले. आता संग्राम घरात पुढच्या प्रवासासाठी कोणत्या सदस्यांबरोबर मैत्री करणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. घरात ‘टीम ए’ फुटल्यापासून मैत्रीचं समीकरणं बदललं आहे. आधी निक्की-जान्हवी एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी होत्या. परंतु आता दोघी एकमेकींशी उठता-बसता भांडणं करत असतात. एवढंच नाही तर आधी आर्याला डोळ्यासमोर न बघणारी जान्हवी गेल्या काही दिवसांपासून घरात तिच्याबरोबर वावरताना दिसत होती. पण, या दोघींची चार दिवसांची मैत्री आता पुन्हा एकदा तुटणार आहे.
हे ही वाचा:
Mukhyamantri Yojana doot व्हायचंय? पण अर्ज कसा करायचा आणि कधीपर्यंत करायचा?
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.