Bigg Boss 16 ‘या कारणामुळे शो ची पातळी … ‘, घराबाहेर येताच विकास मानकतलाने केला गंभीर आरोप

Bigg Boss 16  ‘या कारणामुळे शो ची पातळी … ‘, घराबाहेर येताच विकास मानकतलाने केला गंभीर आरोप

बिग बॉस १६ हा कार्यक्रम कायम चर्चेत असतो. तसेच या कार्यक्रमातील स्पर्धक सुद्धा चर्चेत असतात. या कार्यक्रमातील कोणत्या ना कोणत्यातरी खेळाडूला कार्यक्रमातून बाहेर पडाव लागत. पण नवीन वर्ष साजरे होतानाच घरातील एक स्पर्धकाला बाहेर पाडाव लागलं आहे. या स्पर्धकाचं नाव म्हणजे विकास मानकतला (Vikas Manaktala). विकासला बिग बॉस कार्यक्रमाचा होस्ट सलमान खान (Salman Khan) याने घराच्या बाहेर हकलून दिल आहे. बिग बॉसच्या (Bigg Boss 16) घरात नवीन वर्ष साजरे झाले आणि अशा वेळेस शो मधून बाहेर पडावे लागले म्हणून विकास (Vikas Manaktala) घरातील सर्व स्पर्धकांवर प्रचंड चिडला आहे. या वेळेस विकासने शोवर आणि स्पर्धकांवर आरोप केला आहे. यावेळेस विकासने शोच्या बाहेर येताच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि घरातील “काही स्पर्धकांच्या वागण्यामुळे शोची पातळी खाली जाते.” असे म्हणत काही स्पर्धकांवर विकासने गंभीर आरोप केले आहेत.

विकास मानकतला (Vikas Manaktala) याला बिग बॉसच्या घरातून होस्ट सलमान खान याने बाहेर काढून टाकले आहे. घरातून बाहेर येताच विकासने प्रसार माध्यमांना मुलाखत दिली. यावेळेस विकासने घरातील सर्व सदस्यांबद्दल मोकळेपणाने चर्चा कली. विकासने प्रसार माध्यमांना सांगितले की ” जेव्हा तो बिग बॉसच्या (Bigg Boss 16) घरात गेला होता तेव्हा त्याला लक्षात आले की घरात स्पर्धकांचे गट तयार झाले आहेत. आणि कोणताही स्पर्धक विकासाला गटात घेण्यासाठी तयार नव्हता आणि कोणी त्याला गटांमध्ये मिसळण्याची संधीही दिली नाही. ” विकासने सांगितलं की “त्याला वाटत की तो अजून चांगली कामगिरी करू शकलो असतो पण त्याला कोणी संधीच दिली नाही त्यामुळे मला सुरुवातीचा काळ त्रास सहन करावा लागला पण वाईल्ड कार्ड (Wild Card) एन्ट्री म्हणून माझा प्रवास चांगला होता. “

विकासने (Vikas Manaktala) पुढे अर्चना गौतमबद्दल (Archana Gautam) सांगताना म्हणाला की “अर्चनाच्या असभ्यपणाकडे घरातील एकही स्पर्धक लक्ष देत नाही. स्पर्धकांनी तिला त्यावरून फाटकारले पाहिजे पण असे काही होताना दिसत नाही . कोणीही तिला काहीच बोलत नाही. प्रेक्षकांचे मनोरंजन करणे, योग्य मुद्द्यांवर लढणे या खेळात सर्व काही ठीक आहे, परंतु चुकीचे विचार करणे आणि लोकांच्या भावनांचा फायदा घेणे हे बरोबर नाही आहे . या कारणामुळे शोची पातळी खाली जाते.” असे म्हणत विकासने शोवर आणि अर्चना गौतमवर अप्रत्यक्षपणे आरोप केला आहे.

हे ही वाचा:

शिंदे गटात अस्वस्थता? | Abdul Sattar | Eknath Shinde | Deepak Kesarkar

शाहरुख खानच्या ऑनस्क्रीन मुलीने उर्फ सना सईदने प्रियकराशी केला साखरपुडा, पहा प्रियकराने कसं केलं अभिनेत्रीला प्रपोज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version