बिग बॉस १६ मध्ये आपण पाहत आलो आहे की दिग्दर्शक साजिद खान हा कायम चर्चेत असतो. साजिद खानवर अनेक स्पर्धकांकडून आरोफाइ करण्यात आले. साजिद खानच्या गैर वर्तनावरून किव्हा त्याच्या असभ्य वक्तव्यावरून त्याचे अनेक स्पर्धकांशी वाद झाले आहेत. साजिद खाना एक दिग्दर्शक आहे पण त्याचे बिग बॉसच्या घरातील वागणे बघून चाहती त्याच्यावर नाराज आहेत. अलीकडेच अर्चना गौतम आणि साजिद खान यांच्यात वाद झाले होते यावर साजिद खानला होस्ट सलमान खानने त्याच्या वागण्याबद्दल त्याला फटकारले. सलमान शनिवारी वीकेंड स्पेशल एपिसोड मध्ये दिसला आणि त्याने अर्चना गौतमच्या भांडणासाठी साजिदवर टीका केली.
अर्चना आणि साजिद यांच्या नुकत्याच झालेल्या भांडणात दोघांनी अपशब्द वापरले आणि एकमेकांच्या पालकांनाही त्यात ओढले. जेव्हा सलमानने त्यांच्या भांडणाची चर्चा सुरू केली तेव्हा अर्चनाने त्याला सांगितले की साजिदने तिला शोमधून बाहेर काढण्याची धमकी दिली. ती म्हणाली, “साजिदने तिला सांगितले की, साजिद तिला बिग बॉसमधून काढून टाकू शकतो , तो मोठा दिग्दर्शक आहे. त्यावर अर्चनाने सांगितलं की तिने काय चूक केली?अशा विधानांमुळे संतप्त झालेल्या सलमानने अर्चनाला सांगितले की, साजिदकडे तिला शोमधून काढण्याचा कोणताही अधिकार नाही. सलमान खानने साजिदला सांगितल की , “तुम्ही उत्तम दिग्दर्शक असाल पण तुम्ही बिग बॉस चालवू शकत नाही आणि अर्चनाला कोणीही काढू शकत नाही. सलमान खान स्वतः ते करू शकत नाही आणि बिग बॉसही करू शकत नाही. तिला ठेवायचे की काढून टाकायचे हे फक्त प्रेक्षक ठरवू शकतात.”
सलमानने पुढे सांगितलं की , “साजिदला नेहमी वाटतं की तो बरोबर आहे पण तस नाही तो चुकीचा असेल तेव्हा त्याच्या मित्रांनी आणि इतरांनी त्याला सांगावं.” त्यानंतर सलमानने त्यांना एकमेकांना मिठी मारायला आणि माफी मागायला सांगितलं आणि त्यांनी तसं केलं.
CAA कायदा लागू करण्याबाबत, भाजप नेत्याचं ममता बॅनर्जींना थेट