बिग बॉस मराठीचे चौथे पर्व (Bigg Boss Marathi 4) हे खूप लोकप्रिय ठरते आहे. कारण या पर्वामध्ये खूप मोठ्याप्रमाणात उलथापालथ होताना दिसते आहे. बिग बीसच्या घरात काही ना काही घडतच असत. त्यात स्पर्धकांमध्ये वाद होणं यात काही नवीन गोष्ठ नाही आह. त्यातच घरात नेमका कोणत्या स्पर्धकांचा वाद कोणत्या स्पर्धकांशी होईल हे काही सांगता येण्यासारखं नाही आहे. कारण बिग बॉस च्या घरात कोणीही कोणाचा मित्र नसतो आणि कोणीही कोणाचा शत्रू बिग बॉसच्या घरात शत्रू एकमेकांचे मित्र बनतात आणि मित्रही एकमिकांचे शत्रू बनू शकतात. त्यामुळेच बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांच्यात दिवसेन दिवस वाढ होत आहे.
नुकताच कलर्स मराठी वाहिनीने एक नवीन प्रोमो रिलीज केला आहे. या आठवड्यासाठी घरातील सदस्यांना भूत या थीमवर आधारित टास्क देण्यात आला आहे. तर नवीन प्रोमोत असे दिसत आहे की अमृता देशमुख (Amruta Deshmukh) , अमृता धोंगडे (Amruta Dhongade), अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) , विकास सावंत (Vikas Sawant) , प्रसाद जवादे (Prasad Jawade) , किरण माने (Kiran Mane) हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले आहेत. ते सध्या घरामध्ये कॅप्टन्सी कार्य करत आहेत. या टास्क मध्ये स्पर्धकांना कॅप्टन्सी कार्यातील स्पर्धकांनी विरोधक स्पर्धकांचा खून करून एकेमकांना एलिमिनेट करायचे होते. यात किरण माने आणि राखी सावन्त खुनी होते आणि इतर स्पर्धकांचे खून होणार होते. पण मुख्य म्हणजे या टास्कमध्ये स्पर्धकांना कोणता स्पर्धक खुनी आहे. आणि कोण कोणाचा खून कारण हे माहित नव्हते.त्यामुळे राखी आणि किरणला त्यांचे काम करणे अजून सोप झाल. कारण इतर स्पर्धक हे खुणीबद्दल माहित करून घ्या ऐवजी एकमेकांवरचा आरोप करत होते.
View this post on Instagram
कलर्स मराठीने प्रदर्शित केलेल्या प्रोमोत असे दिसत आहे की आजच्या भागात अमृता धोंगडे आणि विकास हे झालेल्या टास्क विषयी बोलत आहेत. त्यावर अमृता (Amruta Dhongade) विकासला (Vikas Sawant) म्हणते,”तू उभं राहून गोळा करत होतास. ” तिला प्रतिउत्तर देताना विकासने सांगितलं की “नीट बघ कॅमेरामध्ये कळेल तुला.” त्यावर किरण मानेंनी विकासाला सांगितलं की “आम्हाला वाटलं तुला गुडघ्यावर बसता येत नाही.” तर विकास बोलला ” माझी स्ट्रॅटजी आहे ती, मी काय करु, माझी स्ट्रॅटजी तीच होती तिथे. ” विकासाच्या या वक्तव्यावर अमृता संतापली आणि म्हणाली की अरे बापरे स्ट्रॅटजी… चुलीत घाल तुझी स्ट्रॅटजी.” अस अमृताने विकासाला सांगितलं.पण टास्क दरम्यान विकासाच्या खेळामध्ये नेमकं अस काय झालं हे पुढच्या भागात कळेलच. कारण किरण माने आणि अमृता दोघेही जर विकासला साक्षी वागणूक देत असतील तर टास्क मध्ये नक्कीच काहीतरी झालं असण्याची शक्यता आहे. पुढील भागात सगळं उघड होईलच.
हे ही वाचा :
पठाण चित्रपटावर शाहरुख खानची पाहिली प्रतिक्रिया
मोर्च्याच्या परवानगी संधर्भात अजित पवारांची प्रतिक्रिया