बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरू झालं आहे. बिग बॉसच्या या पर्वाला प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सगळीकडेच बिग बॉस आणि घरातील स्पर्धकांचीच सर्वत्र चर्चा सुरु आहे. आता बिग बॉस सुरु होऊन पन्नास दिवस पूर्ण झाले आहेत. या पन्नास दिवसात प्रेक्षकांनी प्रेम,भांडण , दंगा, तोडफोड सगळंच पाहिलं. पण आता स्पर्धकांनी अतिउत्साहाने घेतलेले काही निर्णय हे त्यांच्याच अंगलटी आल्यासारखे दिसत आहे . टास्कच्या नावाखाली बिग बॉसच्या घराची तोडफोड करणाऱ्या अमृता धोंगडेला बिग बॉसने चांगलीच कडक शिक्षा सुनावली आहे.
आपण पहिले तर गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या घरातील काही स्पर्धक हे आपले अस्तित्व टिकून राहण्यासाठी जास्तच आक्रमक होऊन चुकीची पावलं उचलताना दिसत आहेत.तसेच बिग बॉस कडून स्पर्धकांना दिले जाणारे टास्क दिवसेन दिवस अजून कठीण होत चालले आहेत. यामध्ये कॅप्टनसी टास्क जिंकणे हा सर्वांसाठी एक महत्वाचा विषय झालेला आहे. एक आठवडा नॉमिनेशन पासून सुटका मिळत असल्याने म्हणजेच एक आठवडा घरातील मुक्काम पक्का होत असल्याने कॅप्टनपद मिळवण्यासाठी स्पर्धक जीवाची पर्वा न करता, कुठलीही भीती न बाळगता जीव तोडून खेळात आहेत . हाच खेळ बिग बॉसच्या घरातील अमृता धोंगडेला चांगलाच महागात पडला आहे.
नुकतीच कलर्स वाहिनेने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बिग बॉस मराठीचा प्रोमो शेअर केला होता. त्यात कॅप्टनपदासाठी घरात जोरदार लढत होताना दिसली. घरात हत्तीचा एक स्टॅच्यू आणला गेला,या हत्तीच्या गळ्यात जी टीम जास्तीत जास्त रीबन्सचा हार करुन गुंडाळेल त्यांना कॅप्टन पदाचा अधिकार मिळणार होते. दोन्ही टीमला यासाठी वेगवेगळया रंगाच्या रीबन दिल्या गेल्या. कॅप्टनपद मिळवण्यासाठी स्पर्धकांनी जीवाचे रान केले.स्नेहलता अक्षय केळकरला सांगते. त्यांचे सर्व हार उचलून जेलमध्ये टाक, अक्षय तसे करतोही. आता कॅप्टनसी मधून बाद होणार असे वाटत असल्याने ते हार जेल बाहेर काढण्यासाठी अमृता धोंगडे जेलचे दार तोडते. टास्क दरम्यान घराचे नुकसान झाल्याने बिग बॉस अमृतावर प्रचंड चिढले आणि तिला मोठी शिक्षा केली आहे. कॅप्टनपद मिळवण्यासाठी अमृताने हे केल्याने तिला बिग बॉसने दोन आठवडे कॅप्टनसीच्या उमेदवारी पासून दूर राहण्याची शिक्षा दिली आहे.
पण आता बिग बॉसने घेतलेल्या या निर्णयाचा सर्व खेळाडूंवर मोठा परिणाम होताना दिसणारआहे. याचे कारण म्हणजे अमृता कॅप्टन्सी उमेदवारीच्या बाहेर असल्यामुळे याही आठवड्यात कॅप्टन पद कोणत्याही टीमला मिळू शकले नाही आहे. त्यामुळे बिग बॉसचा पुढचा टास्क काय असेल याकडे असल्याचे लक्ष लागले आहे.
दिशा सालियन हत्या प्रकरणात राणेंनी केलेल्या आरोपांना आदित्य ठाकरेंचं प्रतिउत्तर