सध्या ‘बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) च्या चौथ्या पर्वाची चर्चा आहे. हा पर्व सुरू होऊन आता साठ दिवसांचा टप्पा पार झाला आहे.जसे दिवस सरत आहेत तसा खेळ अधिकाधिक रंगत चालला आहे. घरामध्ये एकमेकांच्या विरोधात चांगलीच स्पर्धा पाहायला मिळत आहे. प्रत्येक टास्क मध्ये आपल्याला चढाओढ दिसत आहे. बिग बॉस मराठीच्या घरात एकत्र एंट्री घेतलेलं पाहिलं जोडपं म्हणजे रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) आणि रोहित शिंदे (Rohit Shinde) होते.रुचिरा जाधव गेल्या आठवड्यात शोमधून बाहेर पडली. तर होस्ट महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या घोषणेनंतर रोहित जाधव नुकताच घराबाहेर पडला आहे. अलीकडेच रुचिरा आणि रोहितमध्ये काही वाद झाले होते,आता घराबाहेर पडताच रोहितने देखील याविषयी मोठं भाष्य केलं आहे. तसेच त्याने रुचिरा जाधवला घरात पाठिंबा न देण्याबद्दल देखील भाष्य केले.
नुकतच डॉक्टर रोहित शिंदे (Dr. Rohit Shinde ) हा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला आहे. पण रोहित शिंदे आणि त्याची प्रियसी रुचिरा जाधव या दोघांची बिग बॉस मध्ये एकत्र एन्ट्री झाली होती. केवळ बिग बॉसच्या घरातील खेळ नाही तर या खेळात एकमेकांशी नाते टिकवणे हे देखील त्यांच्यापुढे आव्हान होते. दोन आठवड्यांपूर्वी रुचिरा घराबाहेर पडली. त्यावेळी रुचिरा आणि रोहित यांच्या नात्यात चांगलीच फूट पडली होती. रुचिराने बाहेर येताच त्याला सोशल मिडियावरून अनफॉलो केले. तसेच त्याच्याविषयी स्पष्ट नाराजी व्यक्त केली. .तसेच तिने ‘तो घरातून बाहेर आल्यावर टी बोलेल रोहितला माहिती आहे रुचिरा काही विसरत नाही’, असं देखील म्हटलं होत. अखेर आता रोहित देखील घराबाहेर पडला आणि त्याने रुचिराने केलेल्या आरोपांचे स्पष्टीकरण देखील दिल आहे. रुचिराला वाटत होत की तिला घराबाहेर काढण्यामागे रोहित शेट्टीचाच हात आहे.
View this post on Instagram
यावर रोहित स्पष्टीकरण देत रोहित म्हणाला की ‘रुचीरा जेव्हा एलिमिनेट झाली त्या आठवड्यात रोहितने अनेक गोष्टींवर बोलायला सुरुवात केली होती. त्यामुळे तिची बाजू घेतलीच नाही असं नाही. रुचिरा घराबाहेर जाणार नाही, असे सर्वांनाच वाटत होते. पण तिचे बाहेर जाणं हे सर्वांसाठी धक्कादायक होते. घरातल्या सर्व लोकांना फार धक्का बसला होता”, असे रोहितने सांगितलं.तसेच रुचिराने त्याला इस्टाग्रामवर ब्लॉक केलं आहे याबद्दल बोलताना रोहित म्हणाला की ”अनफॉलो फॉलो हे तितकं महत्त्वाचं आहे असं त्याला वाटत नाही. जरी रुचिराने रोहितला अनफॉलो केलं असेल तर तिने तिच्या जीवनातून एखाद्या माणसाला अनफॉलो केलं असं होत नाही. अनफॉलो करण्याचे कारण कदाचित एखादा ताण वैगरे असू शकतो.”असे रोहितने सांगितलं आहे.
रोहित बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यापासूनच रुचिराबद्दल त्याची प्रतिक्रिया काय असेल त्याच्या चाहत्याना याची भरपूर उत्सुकता होती. तर रोहितच्या स्पष्टीकरणा नंतर रुचिरा आणि रोहितमधील असलेले वाद लवकरच मिटतील अशी त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.
हे ही वाचा :
शिवशक्ती भीमशक्ती प्रयोगावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया