spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘अस्मिता’ फेम अभिनेत्री मयुरी वाघने खरेदी केलं नवं घर

छोट्या पडद्यावरील 'अस्मिता' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभियनेत्री मयुरी वाघ हिने नुकतंच स्वतःचं घर खरेदी केलं आहे.

छोट्या पडद्यावरील ‘अस्मिता’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभियनेत्री मयुरी वाघ हिने नुकतंच स्वतःचं घर खरेदी केलं आहे. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या सुंदर घराचे फोटो शेअर करून तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. मयुरी वाघ आता चांगलीच चर्चेत आली आहे. मराठी अभिनेत्री मयुरी वाघ सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. आता मयुरीने स्वतःचं हक्काचं घर खरेदी करून आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे.

काहीच दिवसांपूर्वी मयुरी वाघ हिचा पूर्व पती पियुष रानडे याने तिसरं लग्न केलं आहे. यामुळे मयुरी चर्चेत असतानाच आता तिने सोशल मीडियावर आपल्या घराचे फोटो शेअर करून सगळ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘अस्मिता’मधून अभिनेत्री मयुरी वाघ हिने प्रेक्षकांच्या मनात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं होतं. या मालिकेनंतरही तिने अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

मालिका विश्वात तिने अनेक सुपरहिट मालिका केल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री मयुरी वाघ आपल्या चाहत्यांशी कनेक्टेड असते. ती चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. आपल्या आयुष्यतील अनेक घडामोडी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते. अभिनेत्री मयुरी वाघ हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर घराचे फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझ्या स्वप्नांच्या यादीमधील आणखी एक गोष्ट आज पूर्ण केली. माझं स्वप्न मी आता माझा कायमस्वरूपी पत्ता बनलं आहे.’ या फोटोंना तिने हॅशटॅग्स देत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. नवीन घर, नवी सुरूवात, कृतज्ञता, आनंदी आयुष्य असे हॅशटॅग्स तिने या फोटोंना दिले आहेत.

तिच्या या पोस्टवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत. ‘अस्मिता’ या मालिकेत काम करत असताना अभिनेत्री मयुरी वाघ आणि अभिनेता पियुष रानडे ही जोडी एकमेकांच्या प्रेमात पडली होती. या मालिकेनंतर दोघांनीही लग्नगाठ बांधली होती. मात्र, काही वर्षातच त्यांचं नातं मोडलं आणि दोघांनीही घटस्फोट घेऊन आपल्या वाटा वेगळ्या केल्या. यानंतर आता अभिनेता पियुष रानडे याने अभिनेत्री सुरुची अडारकर हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे.सध्या मयुरी ही सिंगल लाईफच जगत आहे.

हे ही वाचा:

सरकारने ७ लाख कोटींचे कर्ज जनतेवर लादले पण शेतकऱ्यांनाच पैसे देण्यास टाळाटाळ का ?, नाना पटोले

बॉम्बे हायकोर्ट’ चे नाव ‘मुंबई हायकोर्ट’ होणार, संसदेमध्ये मंत्र्यांनी उत्तर दिले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss