मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या नाळ या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या दुसऱ्या भागाची चाहत्यांना, प्रेक्षकांना उत्सुकता होती. आता त्याचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. २०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ’ या चित्रपटाने अभूतपूर्व यश प्राप्त केले. राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरले.दरम्यन त्या छोट्याशा ‘चैतू’ने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. मात्र ही कथा एका अशा वळणावर येऊन थांबली, जिथे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले. तेव्हा न उलगडलेल्या या प्रश्नांची उत्तरे आता ‘नाळ भाग २’मध्ये मिळणार आहेत.
झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित ‘नाळ भाग २’ दिवाळीत म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. तर नुकतेच या चित्रपटाचे ट्रेलर सोशल मीडियावर झळकले आहे. या चित्रपटात श्रीनिवास पोकळे, नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, दिप्ती देवी, त्रिशा ठोसर आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
‘नाळ’मध्ये खऱ्या आईकडे निघालेला चैतू, त्याच्या खऱ्या आईकडे पोहोचणार का? त्यांच्यातील अबोला दूर होणार का, याचे उत्तर आपल्याला ‘नाळ भाग २’मध्ये मिळणार आहे. ‘नाळ भाग २’चे ट्रेलरही उत्कंठा वाढवणारे आहे. ट्रेलर पाहाता हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी होणार असल्याचे दिसतेय. नागराज मंजुळे या चित्रपटात एक महत्तवाची भुमिका देखील साकारणार आहेत.या सिनेमातील कलाकाराची फौज देखील तगडी आहे. इतक्या ताकदीचे दिसत आहेत, तितकेच चित्रीकरण स्थळही महत्वाची भूमिका बजावत आहे.नदी,दऱ्या, डोंगर, घरे असे निसर्गसौंदर्य चित्रपटात अतिशय सुरेखरित्या टिपण्यात आल्याचे दिसत आहे. ट्रेलरमध्ये विशेष लक्ष वेधत आहे ते चिमुकल्या गोंडस चिमीकडे. तिची निरागसता प्रेक्षकांना मोहणारी आहे. ज्याप्रमाणे ‘नाळ’हा भावनिक, कौटुंबिक चित्रपट होता, तसाच ‘नाळ भाग २’ही आहे.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यंकट्टी म्हणतात, ‘नाळ ची कथा जिथे थांबते तिथून पुढे ‘नाळ भाग २’ची कथा सुरु होते. नात्यांना जोडणारी, घट्ट बांधणारी ही कथा आहे. आम्हाला खात्री आहे, या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तुमच्यासोबत आमची नाळ जोडली जाणारा आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांना कल्पना आली असेलच. त्यामुळे मी मनापासून प्रेक्षकांना सांगतो, हा ‘नाळ भाग २’ चित्रपटगृहात आवर्जून पाहा.’
बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी म्हणतात, ” छोट्याशा गावातील छोटीशी ही कथा आहे. जी मनाला स्पर्शून जाणारी आहे. गावाकडची ओढ लावणारा, आपल्याला गावाच्या प्रेमात पाडणारा हा चित्रपट आहे. ‘नाळ’मधील एवढासा चैतू आता मोठा झाला आहे. त्याचाही परिपक्व अभिनय दिसेल. मात्र यातील चिमी ही सगळ्यात लहान आहे आणि तिने उत्तम अभिनय केला आहे. एकंदरच हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाची अस्सल मेजवानी असणार आहे.
हे ही वाचा :
सुनील तटकरेंचा मोठा दावा, अमोल कोल्हे अजित पवारांसोबत ?
दिवाळी जवळ येतेय…अशी करा प्रत्येक दिवसाची तयारी
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .