‘मुलगी झाली हो’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

‘मुलगी झाली हो’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

स्टार प्रवाह वरील छोटया पड्यावर झळकणारी मालिका ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Jali Ho) हि मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेच्या कथा आणि कलाकारांमुळे त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. मात्र या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ‘मुलगी झाली हो’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या जागी स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘मुलगी झाली हो’ ही मालिका सध्या शेवटच्या टप्प्यात आहे असे बोलले जात आहे. या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम आणि चांगला प्रतिसाद दिला आहे. आता या मालिकेमध्ये शौनकचे (Śaunaka) लग्न होताना दिसणार आहे. शौनकच्या आईने साजिरीच्या वडिलांना लग्नाचे आमंत्रण दिले आहे. आणि दुसरीकडे शौनकला गोजिरी ही त्याचीच मुलगी आहे हे सत्य समजले आहे असे या मालिकेमध्ये दाखवण्यात आले आहे. यामुळे तो लग्न करणार नाही हे सध्याच्या एपिसोडमध्ये पहायला मिळत आहे. आणि ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे असे बोलण्यात आले आहे.

आता प्रेक्षकांना दुपारी देखील नवीन मालिकेचा आस्वाद घेता येणार आहे. ‘मुलगी झाली हो’ या मालिकेच्या जागी स्टार प्रवाह या वाहिनीवर आता ‘शुभविवाह’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. असे दाखवण्यात आले आहे. ‘शुभविवाह’ ही मालिका येत्या १६ जानेवारी पासून सोमवार ते शनिवार दुपारी २.०० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बऱ्याच दिवसानंतर या मालिकेमध्ये अभिनेत्री मधुरा देशपांडे (Madhura Deshpande) प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तसेच मधुरा ही चार वर्षांनंतर मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. या मालिकेमध्ये यशोमन आपटे (Yashoman Apte) हा नायकाच्या भूमिकेत झळकतांना दिसणार आहे. तसेच या मालिकेमध्ये अभिनेत्री विशाखा सुभेदार (Vishaka Subhedar) देखील प्रमुख महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आणि त्याचबरोबर या मालिके मध्ये कुंजीका काळवींट (Kunjika Kalwint ) अभिजित श्वेतचंद्र (Abhijeet Shwetachandra ) हे देखील दिसणार आहे. आणि ही मालिका बघण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुकतेने वाट बघत आहे.

या मालिकेच्या प्रोमोनंतर आता मुलगी झाली हो ही मालिका आटोपती घेण्यावर भर दिला जात आहे. या मालिकेचा शेवट सकारात्मक दाखवला जाणार आहे. यात शौनक आणि साजिरी अखेर एकत्र येणार, अशी आशा प्रेक्षकांना आहे. त्याबरोबरच कधीही न बोलणारी साजिरी आता मालिकेच्या अखेरच्या टप्प्यात बोलताना दाखवले जाणार आहे. त्यामुळे मालिकेच्या शेवटच्या भागाची प्रेक्षकांना उत्सुकता पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : हर हर महादेव चित्रपटाच्या विरोधावर सुबोध भावेंनी मांडली भुमिका, ऐतिहासिक चित्रपटांमध्ये काम करणार नाही

 

Exit mobile version