भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या आजच्या सामन्यात विराट कोहलीने एक उत्कृष्ट फलंदाज कसा असावा हे संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. खरंतर आजच्या सामन्यात पाकिस्तानकडे जिंकण्याची जास्त संधी होती परंतु विराट कोहलीच्या ५३ चेंडूंमध्ये ८२ धावांनी खेळाचं चित्र असं काही बदललं कि पाकिस्तानला निराश व्हावं लागला. पण विराट कोहलीच्या उत्कृष्ट खेळामुळे भारताने टी-20 वर्ल्डकपमध्ये दमदार विजय मिळवत शुभारंभ केला. आज भारताचा विजय झाला आणि या पार्शवभूमीवर राज्यात पुणे, कोल्हापूरसह राज्यात अनेक ठिकाणी अभूतपूर्व जल्लोष हा करण्यात आला.
भारतीय संघाचा हा विजय म्हणजे भारतीय क्रिकेट संघाने सगळ्यात उत्कृष्ट गिफ्ट दिल्याच्या भावना प्रेक्षक व क्रिकेट प्रेमी यांच्यात दिसून आले आहे. पुण्यातील एफ सी रोडवर तरुणाई भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी रस्त्यावर एकवटल्याचे दिसून आले आहे. एफसी रोडवर मोठ्या प्रमाणात तरुणाईचा जल्लोष दिसून आला. यामध्ये गुडलक चौकात तर भारत माता की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी आसमंत दुमदुमन निघाल्याचे दिसून आले आहे. बराचवेळ एफसी रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहवयास मिळाले. शेवटच्या क्षणापर्यत मॅच कोण जिंकणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. अखेर विराट कोहलीच्या खेळीन भारताला विजय मिळाला.
तर दुसरीकडे कोल्हापुरातील शिवाजी चौकात टीम इंडियाने पाकिस्तानला दिलेला दणका असूदे किंवा अन्य मोठ्या स्पर्धांमधील विजय असू दे समस्त कोल्हापूरकर एकत्र येऊन जल्लोष करत आतषबाजी करणे हे समीकरण आहे. श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यात भारताने विजय खेचून आणताच कोल्हापूर शहरातील प्रत्येक गल्लीला व संपूर्ण कोल्हापूर शहरालाच जत्रेचे स्वरुप आले असल्याचे दिसून आले आहे . शेकडो क्रिकेटप्रेमींनी शिवाजी चौकात एकत्र येत जल्लोष केला आहे . यावेळी फटाक्यांची आतषबाजी आणि भारताचा ध्वज हातात घेऊन फडकावत आनंद व उत्साहाने जल्लोष करण्यात आला . पुणे शहर , कोल्हापूर शहर आणि संपूर्ण राज्यात अशाप्रकारे जल्लोष साजरा केला जात आहे.
हे ही वाचा :
Hardik Pandya Emotional : आमच्यासाठी आई बापाने घर सोडलं…; हर्दिक पांड्याचे पाणावले डोळे
बिग बी च्या पायाला टाके; सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली माहिती