श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हा भारतीय संघाचा एक उत्कृष्ट खेळाडू आणि सर्वोत्तम फलंदाज आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. खरंतर श्रेयस अय्यर हा २०२२ हे वर्ष चांगलच गाजवलं आहे. सध्या भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) यांचा सामना चट्टोग्राम (Chattogram) येथे सुरु आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) दुखापतीमुळे सामन्यात सहभागी होऊ शकणार नाही आहे. त्यामुळे त्याच्या जागी केएल राहुलकडे (KL Rahul) कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी नाणेफेक मध्ये भारताचा विजय झाला आणि भारताने पहिले फलन्दजी करण्याचा जिंकून निर्णय घेतला.पण सामना सुरु होताच चित्र भारताच्या दृष्टीकोनातून गंभीर दिसत होत कारण भारताची अवस्था ४ बाद ११२ धावा अशी झाली होती. त्यानंतर श्रेयस अय्यरने संपूर्ण खेळी पालटूनच टाकली.
भारतीयांना क्रिकेट संघातील विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या कडून सर्वाधिक धावांचा विक्रम होण्याची अपेक्षा होती पण या वर्षी चित्र जरा वेगळाच दिसल आहे.भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरने मागील अनेक सामान्यांमध्ये मोठी कामगिरी बजावली आहे. श्रेयस अय्यरने तर भारतातील सर्वच उत्कृष्ट खेळाडूंना मागे टाकलं आहे. तर आता सध्या सुरु असलेल्या भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याच्या पहिल्याच दिवशी श्रेयस अय्यरने भारताला बिकट परिस्थितीतून सावरलं आहे. भारत विरुद्ध बांगलादेश या आजच्या सामन्यात भारताणें नाणेफेक जिंकून प्रथम फलन्दजी करण्याचा निर्णय घेतला. पण सामन्याच्या सुरुवातीलाच ११२ धावांमध्ये के एल राहुल , शुभमन गिल, विराट कोहली आणि ऋषभ पंत हे चार मुख्य फलंदाज बाद झाले. त्यानंतर श्रेयस ऐय्यरने मैदानात आला. त्याने चेतेश्वर पुजारासोबत ५व्या विकेटसाठी १४९ धावा केल्या, ज्यामुळे भारताला सुरुवातीच्या धक्क्यातून सावरण्यास मदत झाली.पण नंतर श्रेयस अय्यर १६९ चेंडूंमध्ये ८२ धाव करत नाबाद होता आणि चेतेश्वर पुजारा २०३ चेंडूत ९० धाव करात नाबाद होता.
श्रेयस अय्यरने या वर्षी २०२२ मध्ये भारताकडून सर्वाधिक धाव करण्याचा माईल स्टोन पार करत एक नवा विक्रम केला आहे. श्रेयस अय्यरने या आधी देखील दोन सामन्यांमध्ये अशाच प्रकारे उत्कृष्ट फ्लनंदजी करत भारताला सावरला होत.
हे ही वाचा :
विवेक अग्निहोत्रींनी पठाण चित्रपटातील ‘या’ गाण्याच्या केलेल्या टिपण्णीवर, शाहरुखचे चाहते झाले नाराज
सुषमा अंधारेंनी मागितली वारकऱ्यांची माफी