Sukh Mhanje Nakki Kay Asta मालिकेत दिसणार जयदीपचा हटके लूक

Sukh Mhanje Nakki Kay Asta मालिकेत दिसणार जयदीपचा हटके लूक

स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेत अखेर सर्वांच्या लाडक्या जयदीप आणि गौरीची भेट ही झाली आहे. शालिनीमुळे जयदीप-गौरीला एकमेकांपासून वेगळं व्हावं लागलं होत. परंतु आता तिला जयदीप-गौरी लवकरच चांगलाच धडा शिवणार आहेत. सुरुवातीला शालिनीने चिमुकल्या लक्ष्मीला जीवे मारण्याचा बऱ्याचदा प्रयत्न केला. त्यावेळी लेकीच्या प्रेमापोटी जयदीपला शिर्के पाटलांच्या घरापासून दूर राहावं लागलं. आणि त्यामुळे तो गौरीपासूनही दुरावला. मात्र आता जयदीप गौरी एकत्र आले आहेत. आपल्या अनुपस्थितीत शालिनीने गौरीला दिलेल्या त्रासाचा बदला जयदीपला घ्यायचा आहे. यासाठीच त्याने नवं रुप धारण केलं आहे.

शालिनीला धडा शिकवण्याच्या उद्देशाने ते दोघे आता एकत्र येऊन नवीन नवींन युक्त्या करणार आहेत. शालिनीला तिच्या पापांचं प्रायश्चित देण्यासाठी जयदीप वेष पालटून शिर्के पाटलांच्या घरात दाखल होणार आहे. यासाठी जयदीपने एका वृद्धाचा लूक केला असून तो लक्ष्मी इंडस्ट्रीजचा मालक म्हणजेच जयवंत देशमुख असल्याचं आता भासवणार आहे. शालिनी हि पैशांची लोभी आहे. हे अनेकदा सिद्ध झालं आहे. आता लक्ष्मी इंडस्ट्रीजचा मालक घरी आलाय म्हणल्यावर त्याच्या पैशांवर देखील शालिनीचा डोळा आहे. पैसे मिळवण्यासाठी ती काहीही करु शकते. त्यामुळे जयवंत देशमुख हा नवा अवतार धारण केलेल्या जयदीपच्या तालावर शालिनी कशी नाचणार हे पाहणं उत्सुकतेचं असेल.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत गिरिजा प्रभू, मंदार जाधव, माधवी निमकर आणि वर्षा उसगावकर हे कलाकार प्रमुख भूमिका साकारत आहेत. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहेत.

हे ही वाचा:

ऋषभ पंतला मिळणार ‘या’ दिवशी डिस्चार्ज

दावोसमध्ये राज्यासाठी १ लाख ३७ हजार कोटींचे करार, मुख्यमंत्रांची माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version