प्रेक्षकांची आवडती मालिका ‘माझी तुझी रेशीम गाठ’ आता महत्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. यश ने नेहाबद्दल आजोबाना सत्य सांगितल्यापासून यश आणि त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचे दाखवले होते. यश पॅलेस सोडून नेहाकडे राहायला गेला होता. परी तिच्या आईसोबत आजोबांना भेटायला पॅलेसवर गेली होती. तिथे ती आजोबांना सॉरीचं एक पत्र देऊन तिच्या फ्रेंडला माफ करायला सांगते. नेहा ने सुद्धा आजोबांची माफी मागितली. आजोबा आणि यशचं नातं चिमुकल्या परीमुळे पूर्ववत झाल्याने चाहते खुश आहेत.
या संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान साखरपुडा आणि हळदी समारंभाचे अनेक व्हिडिओ कलाकारांनी पोस्ट केले आहेत. यावरून प्रेक्षकांना येत्या भागात धम्माल अनुभवायला मिळणार हे मात्र नक्की. अखेर नेहा – यश चं नातं पूर्णत्वाला येणार यामुळे चाहते सुद्धा खूप खुश आहेत. बऱ्याच व्हिडीओ खाली चाहत्यांनी नेहा आणि यश चं लग्न पाहण्यास उत्सुक असल्याच्या कमेंट्स देखील केल्या आहेत. याचबरोबर मालिकेत आणखी काय काय ट्विस्ट पहायला मिळणार सिम्मी काकू लग्नात काही विघ्न तर आणणार नाही ना ? हे पाहण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहेत.