मुंबई : मालिकेतील प्रत्येक घटनेवर आजकाल सोशल मीडियावर परखडपणे आपलं मत मांडता येतं. मग ते मिम्स द्वारे असो वा कॉमेंट्स द्वारे प्रेक्षकांना जर एखादा सीन भावाला तर ते कौतुकाची थाप देतात आणि जर नाही आवडला तर नावही ठेवतात. त्यात आता ‘तू चाल पुढं’ ही आणखी एक मालिका आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमोही शेअर करण्यात आला.
हेही वाचा :
देवेंद्र फडणवीस ‘शिवतीर्थ’वर दाखल, राज ठाकरेंना भेटण्यामागचे कारण काय?
या मालिकेची गोष्ट आहे एका गृहिणीने पाहिलेल्या मोठ्या स्वप्नांची. एकत्र कुटुंब असलेल्या घरी अश्विनीला देखील त्यांच्या नवीन घरासाठी काहीतरी करण्याची इच्छा असते, हे या प्रोमो मधून दिसून येत आहे. तू चाल पुढं’ ही मालिका येत्या 15 ऑगस्टपासून संध्याकाळी 7.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मालिकेला प्रोमो समोर येताच ही मालिका म्हणजे जुन्या काही मालिकांचं नवीन वर्जन असल्याचं म्हंटल जातंय. ‘आई कुठे काय करते’ मधली अरुंधतीची नक्कल केल्याचं म्हटलं जात आहे. कथानकही हुबेहूब असल्याचा प्रेक्षक म्हणतायत. तर काही प्रेक्षकांनी ‘मन उडू उडू’ झालं हि मालिका सुरु ठेवा अशी ईच्छा व्यक्त करत कमेंट्स केल्या आहेत.
या मालिकेत आपल्या नवीन भूमिकेबद्दल दीपा सांगते, ‘बऱ्याच काळानंतर मराठी दैनंदिन मालिका करताना स्वतःच्या घरी परतल्याची भावना आहे. ‘तू चाल पुढं’ या मालिकेचं कथानक अतिशय सुंदर असून कथा अश्विनी या गृहिणीभोवती फिरते. आपल्या कुटुंबासाठी ती काय करते हे प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळेल. बऱ्याच कालावधीनंतर मराठी मालिका करतेय, त्यामुळे प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंबा भरभरून मिळेल अशी मी आशा करते.