Sasural Simar ka: ‘ससुराल सिमर का’ फेम ‘या’ अभिनेत्रीने केली आत्महत्या इंदूरमध्ये गळफास घेऊन संपवले आयुष्य

अभिनेत्रीने इंदूर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अभिनेत्रीच्या निधनाच्या बातमीने टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे.

Sasural Simar ka: ‘ससुराल सिमर का’ फेम ‘या’ अभिनेत्रीने केली आत्महत्या इंदूरमध्ये गळफास घेऊन संपवले आयुष्य

टीव्ही इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो ससुराल सिमर का मधील अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने आत्महत्या केली आहे. अभिनेत्रीने इंदूर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अभिनेत्रीच्या निधनाच्या बातमीने टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. तिच्या या आत्महत्येने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. अभिनेत्रीने आत्महत्या का केली, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. तर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली आहे

अभिनेत्रीने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठीही लिहिली होती. जी पोलिसांच्या हाती लागली आहे. मात्र, या सुसाईड नोटमध्ये काय लिहिले आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात पोलिसांनी प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याच्या संशयावरून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असल्याचं बोललं जात आहे.अभिनेत्रीने इंदूरच्या साईबागमध्ये राहत्या घरी गळफास लावून घेतला.

ये रिश्ता क्या कहलाता है मध्येही दिसली होती अभिनेत्री

वैशाली ठक्कर प्रसिद्ध शो ये रिश्ता क्या कहलाता है मध्ये संजनाची भूमिका साकारताना दिसली होती. या शोमधून तिला बरीच ओळखही मिळाली. यानंतर तिने ‘ससुराल सिमर का’ या शोमध्ये अंजलीची भूमिका साकारली होती. वैशालीला गोल्डन पेटल अवॉर्डमध्ये नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे. या शोनंतर ती ये वादा रहा, ये है आशिकी, ससुराल सिमर का, सुपर सिस्टर, लाल इश्क आणि विष आणि अमृतमध्ये दिसली होती.

वैशाली शेवटची २०१९ च्या मनमोहिनी शोमध्ये दिसली होती. वैशालीने टीव्हीशिवाय चित्रपटांमध्येही काम केले आहे. वैशाली ही मूळची उज्जैनमधील महिदपूरची आहे.

गेल्या वर्षी अभिनेत्रीने तोडला होता साखरपुडा

बातम्यांनुसार, वैशालीचा २०२१ मध्ये एप्रिल महिन्यात साखरपुडा झाला होता. कुटुंबीय आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत अभिनेत्रीच साखरपुडा झाला होता. मात्र, लग्नाच्या एका महिन्यानंतर वैशालीने तिचा साखरपुडा रद्द केला आणि त्यानंतर लग्न करणार नाही असेही वैशालीने सांगितले होते. पण, तिचा साखरपुडा
मोडल्याचे कारण समोर आले नव्हते.

हे ही वाचा:

Har Har Mahadev : ‘हर हर महादेव’ चित्रपटातील नवं गाणं रिलीज

Sonam Kapoor : अभिनेत्री सोनम कपूरचा व्हिडीओ होतोय व्हायरल; करवा चौथची तयारीआणि …

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version