‘साधी माणसं’ या मालिकेतून शिवानी बावकर-आकाश नलावडे ही जोडी येणारं प्रेक्षकांच्या भेटीला

छोट्या पडद्यावरील मालिका पाहण्याकडे प्रेक्षकांचा कल वाढला आहे.दरम्यान वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

‘साधी माणसं’ या मालिकेतून शिवानी बावकर-आकाश नलावडे ही जोडी येणारं प्रेक्षकांच्या भेटीला

छोट्या पडद्यावरील मालिका पाहण्याकडे प्रेक्षकांचा कल वाढला आहे.दरम्यान वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.दरम्यान मालिकेत येणारे चेहरे जरी परिचयाचे असले तरी वेगवेगळ्या भूमिकेत या कलाकारांना पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी प्रेक्षक तितकेचं उस्तुक असतात.

अशातच आता ‘साधी माणसं’ ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. “जगात चांगली, आपली सांगली”, असं आत्मविश्वासाने मिरवणाऱ्या सांगली शहरात या मालिकेची गोष्ट घडते. मीरा आणि सत्या या दोन मुख्य पात्रावर मालिकेतील कथा दाखवण्यात येत हे.दोन माणसं वेगळी तसेच त्यांचे स्वभाव देखील तितकेच भिन्न विचारांचे असतात. एकाच गावात रहात असणारी ही दोघं भिन्न स्वभावाची आहेत.

मीरा स्वभावाने अतिशय सकारात्मक, सहनशील,सौज्वळ आणि संपूर्ण कुटुंबाचा विचार करणारी. घरची परिस्थिती बेताची असली तरी हेही दिवस सरतील असा आत्मविश्वास बाळगणारी ती आहे. तर सत्या आणि नशिबाचा 36 चा आकडा आहे. डॉक्टर व्हायचं त्याचं स्वप्न होतं पण गॅरेजमध्ये मेकॅनिकचं काम करतो. स्वत:च्या धुंदीत रहाणारा. अश्या या विभिन्न स्वभावाच्या मीरा आणि सत्यामध्ये नियती नेमका कोणता खेळ करणार याची गोष्ट म्हणजे साधी माणसं ही मालिका आहे.

अभिनेता आकाश नलावडे हा साधी माणसं या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहे. ही नवी भूमिका साकरण्यासाठी तो खूपच उत्सुक आहे. भूमिकेबद्दल तो म्हणाला, पश्या या माझ्या भूमिकेला खूप प्रेम मिळालं. या भूमिकेने मला घराघरात पोहोचवलं. तेच प्रेम सत्यालाही मिळेल ही अपेक्षा आहे. या मालिकेतला माझा लूकही खूप वेगळा आहे. साध्या माणसांची ही गोष्ट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असं आकाश म्हणाला.

लागिरं झालं जी या मालिकेत शितली ही भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवणारी शिवानी बावकर या मालिकेत मीरा ही मुख्य भूमिका साकारणार आहे.तर सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतून घराघरात पोहोचलेला पश्या म्हणजेच लोकप्रिय अभिनेता आकाश नलावडे या मालिकेत सत्याची भूमिका साकारणार आहेत. या मालिकेची निर्मिती रणजीत ठाकूर आणि हेमंत रुपारेल यांच्या फ्रेम्स प्रोडक्शनची आहे. अजय कुरणे या मालिकेचं दिग्दर्शन करणार असून अनेक दिग्गज कलाकार मालिकेतून भेटीला येतील..

Exit mobile version