Sukh Mhanje Nakki Kay Asta : आपल्या भारतीय संस्कृतेत नवरात्री या सणाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे प्रत्येक जण या सणात कसं सहभागी होता येईल यासाठी प्रयत्न करत असतो. त्यात टीव्हीवरील मालिका कशा मागे राहतील. स्टार प्रवाह वरील सर्वांची लाडकी मालिका ‘ सुख म्हणजे नक्की काय असत’ हि सध्या एक वेगळ्या टप्प्यावर आली आहे. नुकतंच ‘सुख म्हणजे नक्की काय असतं!’ (Sukh Mhanje Nakki Kay Asata) ची टीम कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला जाऊन आली आहे. मालिकेतील एका महत्वाचा भाग शूट करण्यासाठी संपूर्ण टीम तिथे गेली होती. आणि याच मालिकेतील जयदीप आणि गौरीच्या आयुष्यात लवकरच सुखाचे क्षण येताना दिसत आहेत.
जयदीप हे पात्र साकारणारा अभिनेता मंदारने देखील या विशेष भागासाठी खूप मेहनत केली आहे. मंदारने यापूर्वी देखील कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतले आहे. परंतु त्याची इच्छा होती की मालिकेचा एकतरी भाग या पवित्र जागी चित्रित व्हावा. मंदारने सांगितले की, “देवी अंबाबाईच्या आशीर्वादाने माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे. शूटिंगच्या निमित्ताने मला इथे काम करण्याची संधी मिळाली हे क्षण मी कधीच विसरू शकत नाही. या विशेष भागचे शूटिंग पाहण्यासाठी हजारो प्रेक्षकांनी गर्दी केली होती. प्रेक्षकांचे हे प्रेम मला नवी ऊर्जा देतं.”
हे ही वाचा:
जाणून घ्या, सुझलॉन, आरआयएल, ओएनजीसी, गॅस, एअरटेल, एचएफसीएल, अदानी एंटरप्राइजेस यांच्या स्टॉक्सबाबत
Alia Bhatt: ‘भर पुरस्कार सोहळ्यात भाषण सुरु असताना बाळानं पोटात मारली लाथ’