अर्जुनसमोर उघडकीस येणारं चैतन्य-साक्षीचं अफेअर,मालिकेत येणारं मोठा ट्विस्ट

छोट्या पडद्यावरील 'ठरलं तर मग' मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत आहेत.

अर्जुनसमोर उघडकीस येणारं चैतन्य-साक्षीचं अफेअर,मालिकेत येणारं मोठा ट्विस्ट

छोट्या पडद्यावरील ‘ठरलं तर मग’ मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत आहेत.ही मालिका गेले अनेक आठवडे टीआरपी यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.मालिकेतील सायली-अर्जुनवर प्रेक्षक चांगली पसंती दाखवत आहेत.सध्या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे.ट्विस्ट आणि मालिका हे मोठं समीकरण असतं.

दरम्यान मागील एपिसोडमध्ये आपण सायली-अर्जुनची माथेरान ट्रीप पाहिली,या ट्रीपमध्ये सायली-अर्जुनच्या नात्यातील दुरावा कमी होऊन जवळीक वाढली आहे.मात्र या दोघांना त्रास द्याला प्रिया तिकडे गेलेली असते.ना ना प्रयत्न करुन त्यांच्या या ट्रीपमध्ये आडकाटे आणण्याचा खुप प्रयत्न करते.मात्र त्या ट्रीपमध्येच अर्जुन सायलीच्या प्रेमात पडलेला असतो.हे त्याच्या लक्षात येतं.अर्जुनचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. ‘मिसेस सायली मी तुमच्या प्रेमात पडलोय, I Love You Mrs सायली’, हे वाक्य तो वारंवार स्वत:शीच बडबडत असतो. त्यांच्या खोलीतील सायलीची प्रत्येक वस्तू हाताळून तो त्याच्या प्रेमाची कबुली देतो. तो विचार करतो ही गोष्ट सर्वात आधी त्याचा बेस्ट फ्रेंड चैतन्यला सांगायला हवी.

दुसरीकडे साक्षी चैतन्यच्या घरामध्ये साफसफाई करू लागते. आपल्या घरात मला पसारा आवडत नाही, असं म्हणून ती चैतन्यला पुन्हा एकदा गुंडाळते. साक्षी त्याच्या घराला ‘आपलं घर’ म्हणते आणि याच गोष्टीमुळे तो तिच्याकडे आणखी आकर्षित होतो. जेव्हा त्याला अर्जुनचा फोन येतो तेव्हा साक्षी स्टूलवरुन खाली पडल्याचं नाटक करते.आणि चैतन्यला अजुन जवळ आणण्याचा प्रयत्न करते.

तर सध्या मालिकेच्या प्रोमामध्ये दाखवण्यात आलं आहे की, अर्जुन त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट आधी चैतन्यला सांगण्यासाठी जातो. दुसऱ्या दिवशी तो तातडीने कार घेऊन चैतन्यकडे जाण्यासाठी निघतो, कारण तो सायलीच्या प्रेमात पडल्याचे त्याला सांगायचे असते. जेव्हा तो चैतन्यच्या घरी पोहोचतो तेव्हा त्याला चैतन्य आणि साक्षी एकमेकांना मिठी मारुन बसलेले दिसतात. साक्षी-चैतन्यला एकत्र पाहून अर्जुनचा पारा चढतो. ‘ही मुलगी काय काय करू शकते, हे आपण वात्सल्य आश्रम केसमध्ये पाहिलंय. साक्षी शिखरे तुझ्या घरात काय करतेय?’ असा सवालच तो चैतन्यला विचारतो. तेव्हा चैतन्य त्याला सांगतो की साक्षीचं आणि त्याचं एकमेकांवर प्रेम आहे.आणि आम्ही लग्नं करणार आहोत.मात्र हे ऐकून अर्जुन चैतन्यवर भडकतो आणि त्याला खुप काही ऐकवतो.आता येणाऱ्या भागात काय घडणार हे पाहणं औस्तुकत्तेचं ठरणार आहे.

हे ही वाचा: 

पॅराग्लायडिंगच्या पंढरीत रंगणार साहसी क्रीडाप्रकाराचा मेळा

छोट्या पडद्यावरील‘आई कुठे काय करते’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप ? चर्चा सुरु

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version