ऋता दुर्गुळेचा डॅशिंग अंदाज आणि प्रथमेश परबने साकारलेला दगडू यामुळे टाइमपास ३ ला प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे. पण, जरी हा सिनेमा लोकांच्या पसंतीस पडत असला तरी त्यातल्या एका दृष्यामुळे आता हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मराठी एकीकरण समितीने घेतलेल्या अक्षेपामुळे हा वाद निर्माण झाला असून. सिनेमाचे दिग्दर्शक रवी जाधव यांनी यासंदर्भात जाहीर माफी मागावी, अशी मागणी देखील केली जात आहे. या संदर्भात मराठी एकीकरण समितीने फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत. त्यात रवी जाधव, प्रथमेश परब, संजय नार्वेकर यांना टॅग केले आहे.
मराठी एकीकरण समितीने केलेल्या या आरोपांवर रवी जाधव किंवा सिनेमाच्या कोणत्याही कलाकारांकडून काही प्रतिक्रिया देण्यात आली नाहीये. आता या आरोपांमुळे सिनेमातील दृश्य काढून टाकलं जातंय का? आणि रवी जाधव यावर नक्की काय प्रतिक्रिया देतात? याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.
बॉक्सऑफिसवर टाइमपास ३ हिट की फ्लॉप?
‘टाइमपास ३’ हा सिनेमा २९ जुलै रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. सिनेमात अभिनेत्री हृतानं पालवीची भूमिका साकारलीय तर अभिनेता प्रथमेशनं दगडूची भूमिका साकारली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन रवी जाधव यांनी केलं आहे.हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई करत आहे. सिनेमानं पहिल्याच दिवशी ८० लाख रुपयांची कमाई केली. सिनेमाचं एकूण बजेट १० कोटी रुपये असून पहिल्याच आठवड्यात सिनेमानं १ कोटी १० लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे. हा सिनेमा ४०० स्क्रिन्सवर १० हजार शोजसह प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
View this post on Instagram