spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

तारक मेहता का उल्टा चष्माच्या सेटवर भरलं पाणी

मुंबई मध्ये सलग दोन दिवस सतत जोरदार  पाऊस येत आहे.अनेक ठिकाणी पाणी देखील साचले आहे.तर या पावसाचा फटका तारक मेहता का उलटा चष्मा च्या सेट वर बसला आहे.

मुंबई मध्ये सलग दोन दिवस सतत जोरदार  पाऊस येत आहे.अनेक ठिकाणी पाणी देखील साचले आहे.तर या पावसाचा फटका तारक मेहता का उलटा चष्मा च्या सेट वर बसला आहे.सतत येणाऱ्या पावसामुळे सेटवर पाणी साचले आहे त्यामुळे सलग दोन दिवस शूटिंग रद्द करण्यात आली आहे.तारक मेहता का उलटा चष्मा हा कार्यक्रम अनेकांचा आवडीचा कार्यक्रम आहे.या कार्यक्रमामुळे अनेकांचे मनोरंजन होत असते.या कार्यक्रमाबद्दल बोलायचं झालं तर दयाबेन चं पात्र सकरणारी अभिनेत्री दिशा वकानी हिच्या अभिनयाचे अनेक चाहते होते जेठलाल आणि दया या दोघांची जोडी नेहमीच सुपरहिट ठरायची.

तर आता मालिकेत लवकरच नवीन दया बेन च्या भूमिकेत राखी विजन ही अभिनेत्री पाहायला मिळणार आहे.राखी दया चं पात्र कसं साकारणार यावर अनेकांचं लक्ष वेधुन आहे.दया बेन नंतर अनेक कलाकारांनी तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेचा निरोप घेतला.नेहा मेहता,निधी भानुशाली, गुरुचरण सिंह आणि भव्या गांधी यांनी शो चा निरोप घेतला आहे.त्यातच आता महत्वाच्या पात्राने म्हणजेच शैलेश लोढा यांनी देखील ही मालिका सोडली आहे.शैलेश यांचं निर्माता आणि दिग्दर्शक यांच्यामध्ये वाद झाल्यामुळे मालिका सोडली असं समजण्यात आलं आहे.

तर नेहा मेहता यांनी 2 वर्षाआधीच ही मलिका सोडली.मात्र त्यांना त्यांच्या मेहनतीचे पैसे देण्यात आले नव्हते असे त्यांनी सोशल मीडियावर कळवले होते.ही घटना अनेक प्रेक्षकांना कळल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी निर्मात्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली होती.मात्र नीला फिल्म्स प्रोडक्शन यांनी नेटकऱ्यांना माहीती दिली की नेहा मेहता यांनी लावलेला आरोप हा सर्रास खोटा आहे.यानंतर गुरुचरण सिंह यांनी देखील पैसे न मिळण्याचा आरोप केला होता.तर नेमकं सत्य काय आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

Latest Posts

Don't Miss