या वर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार कुणाला? केंद्र सरकारने केली घोषणा

अनुराग ठाकूर यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांना दिला जाणार आहे.

या वर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार कुणाला? केंद्र सरकारने केली घोषणा

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. चित्रपट विश्वातील त्यांच्या अतुलनीय योगदानामुळेच त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. आशा पारेख यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक उत्तमोत्तम चित्रपट केले आहेत, ज्यांनी बॉलिवूडला एका नव्या वळणावर नेले आहे. ‘भारतीय चित्रपटांचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे दादासाहेब फाळके यांच्या नावाने दरवर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो. गेल्या वर्षी रजनीकांत यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते आणि यंदा हा पुरस्कार आशा पारेख यांना देण्यात आला आहे.

वृत्तसंस्था एएनआयने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांना दिला जाणार आहे. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या सेवेबद्दल त्यांना १९९२ मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित केले आहे.

वयाच्या १० व्या वर्षी केली करिअरला सुरुवात

आशा पारेख यांना हिंदी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात प्रभावी अभिनेत्रींपैकी एक मानले जाते. पारेख यांची चित्रपट कारकीर्द १९६० ते १९७० च्या दरम्यान शिखरावर पोहोचली. आशा पारेख यांनी बालकलाकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्या फक्त १० वर्षांच्या असताना चित्रपट निर्माते बिमल रॉय यांनी ‘मा’ (१९५२) या चित्रपटात भूमिका केली. काही चित्रपटांनंतर, त्यांनी आपल्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी ब्रेक घेतला . त्यानंतर मुख्य अभिनेत्री म्हणून त्यांचा पहिल्या चित्रपटातून ‘दिल देके देखो’ (१९५९) मधून सिनेसृष्टीत पुनर्पदार्पण केले. या चित्रपटात त्यांच्यासोबत शम्मी कपूर होते आणि नासिर हुसैन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

आशा पारेख यांचे हिट चित्रपट

आशा आणि हुसैन यांनी एकत्र अनेक हिट चित्रपट दिले – ‘जब प्यार किसी से होता है’ (१९६१), ‘फिर वही दिल लाया हूं’ (१९६३), ‘तीसरी मंझिल’ (१९६६), ‘बहारों के सपने’ (१९६७), ‘द. सीझन ऑफ लव्ह’ (१९६९), आणि ‘कारवां’ (१९७१). राज खोसला यांच्या ‘दो बदन’ (१९६६), ‘चिराग’ (१९६९) आणि ‘मैं तुलसी तेरे आंगन की’ (१९७८) आणि शक्ती सामंताच्या ‘कटी पतंग’ या चित्रपटांमुळे त्यांची स्क्रीन इमेज बदलली आणि त्या गंभीर, दुःखद भूमिकांमध्ये साकारू लागल्या.

टीव्ही क्षेत्रातील आशा पारेख यांचे योगदान

आशा पारेख यांनी गुजराती, पंजाबी आणि कन्नड चित्रपटांमध्येही काम केले आहे. काही काळानंतर त्यांनी दूरचित्रवाणीचे माध्यम स्वीकारले आणि स्वतःची निर्मिती संस्था सुरू केली. त्यांनी गुजराती मालिका ‘ज्योती’ (१९९०) दिग्दर्शित केली आणि ‘पलाश के फूल’, ‘बाजे पायल’, ‘कोरा कागज’ आणि ‘दाल में काला’ सारख्या शोची निर्मिती केली.

भारतीय चित्रपटसृष्टीचा सर्वोच्च पुरस्कार

दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान आहे. मागील प्राप्तकर्त्यांमध्ये राज कपूर, यश चोप्रा, लता मंगेशकर, मृणाल सेन, अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना यांचा समावेश आहे. देविका राणी या ह्या पुरस्काराच्या पहिल्या विजेत्या होत्या तर अलीकडच्या काळात अभिनेता रजनीकांत यांना ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

हे ही वाचा:

घ्या जाणून वेळापत्रक ; नागपूरवरुन सुटणार ‘फेस्टिव्हल स्पेशल’ गाड्या

अभिनेत्री जॅकलिनला दिल्ली कोर्टाकडून दिलासा, सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिनचे काय संबंध होते?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version