स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेत नुकताच एक मोठा ट्विस्ट आला आहे. या मालिकेने तब्ब्ल ६ वर्षांचा लीप घेतला आहे. या लीपनंतर मालिकेच्या कथानकात अनेक बदल करण्यात आले आहेत. सध्या वाहिनीवर दाखवण्यात आलेल्या प्रोमोनुसार जयदीप आणि गौरी एकमेकांपासून दुरावल्याचं चित्र पाहायला मिळतंय. जयदीप गौरीची पुन्हा भेट होणार का? याची उत्सुकता नक्कीच आहे. मात्र, मालिकेत लवकरच नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे.
हे ही वाचा :
Aishwarya Rai Bachchan Birthday : ऐश्वर्या रायचे वाढदिवसा निमित्त पहा खास फोटो
RBI Digital Rupee : RBI चा डिजिटल रुपया आज लॉन्च होणार आहे, जाणून घ्या त्याच्याशी संबंधित सर्व तपशील
महापालिका निवडणुकांपूर्वीच निकाल लागावा याबद्दलचा आमचा आग्रह आहे ; अनिल देसाई