बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) हिनं मनोरंजन विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.बॉलीवूडच्या चमचमत्या दुनियेत झगमगाटापासून दूर राहात फक्त आपल्या अभिनयाच्या जोरावर यश प्राप्त केलेल्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून यामी गौतम ओळखली जाते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत यामीने सांगितले की, एक वेळ अशी होती की तिला इंडस्ट्री सोडायची होती. तिला वाटू लागले की इथे फक्त दिसण्यालाच महत्त्व दिले जाते.
यामीने फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुरू असलेल्या व्यवस्थेबद्दल भाष्य करत सांगितले की, जेव्हा तुम्हाला तुमच्या मनातून एखाद्या गोष्टीबद्दल वाईट वाटते. हा कोणत्याही व्यक्तीबद्दलचा राग नाही. मी फक्त माझा दृष्टिकोन मांडत आहे. करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये प्रत्येकाला अशा भावनेचा सामना करावा लागेल, असं यामी म्हणाली. यामीने फिल्म इंडस्ट्रीमध्ये चालू असलेल्या सिस्टमबद्दल सांगितले की, जेव्हा तुम्हाला तुमच्या मनापासून एखाद्या गोष्टीबद्दल वाईट वाटते. हा कोणत्याही व्यक्तीबद्दलचा राग नाही, मी फक्त माझा दृष्टिकोन मांडत आहे. यामी म्हणाली की, करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये प्रत्येकाला अशा भावनेचा सामना करावा लागेल. यामी म्हणाली की, मला कोणताही मोर्चा काढायचा नाही, किंवा ही मोहीम नाही, प्रत्येकाचा एक टप्पा असतो.
तसेच ती पुढे म्हणाले, “बाला सिनेमा करण्यापूर्वी इंडस्ट्रीतून बाहेर पडणार होते. चांगलं काम करुनही जशी ओळख प्राप्त व्हायला हवी होती तशी झाली नाही. मला हे सारं सोडून द्यायचं होतं. मला अभिनयात खूप रस आहे, पण याचा अर्थ तुम्ही दुसरं काहीच करू शकत नाही असा होत नाही. मी ठरवलंही होतं आणि आईनंही मला हवं ते करण्याची मुभा दिली होती. ज्यात तुला सुखाची झोप येईल असं काम कर असं आईनं सांगितलं होतं. कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नको. मेहनत कर पण प्रत्येक गोष्टीचा निकाल चांगलाच लागला पाहिजे असं काही बंधनकारक नाही”, असं यामीनं सांगितलं.
“जसे अवॉर्डचे सोहळे असतात त्याच पद्धतीनं हेही सुरू असतं. पण एक अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून तुम्ही विचार करत असता की त्या मुलाखतीत, स्टेजवर आपणही हवे होतो. पण तुम्हाला निमंत्रितच करण्यात आलेलं नाही. आता मला निमंत्रित केलंही जातं. पण मी हे त्यावेळची गोष्ट सांगत आहे जेव्हा माझ्या करिअरच्या सुरुवातीचा काळ होता. चित्रपटात तुम्ही मुख्य भूमिकेत असता पण तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावलं जात नाही. कारण तुम्ही प्रसिद्ध चेहरा नसता”, असं यामी दिलखुलासपणे बोलली.
अनेक निर्माते म्हणतात की तुम्ही पीआरकडे थोडे लक्ष द्या. त्यामुळे मी करू शकत नाही. कोणतीही गोष्ट करताना गरज भासली तर ती गरजेनुसार करावी, असे मला वाटते. ते तुमच्या आयुष्याचा एक भाग कधी बनतात हे कळतही नाही. मला फक्त चांगले काम करायचे आहे. बाला या चित्रपटासाठी नामांकन न झाल्याने मी खूप नाराज झाली होती. मी या टप्प्यावर आले होते की आता मी कोणताही चित्रपट करणार नाही. मला सोडायचे होते. असा देखील खुलासा यामीने केला आहे.
हे ही वाचा:
नवंवर्षाच्या पहिल्याच दिवशी राणीच्या बागेत रेकॉर्डब्रेक गर्दी, तब्बल ३२, ८२० लोकांनी लावली हजेरी
आजपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर
रतन टाटा यांचे निकटवर्तीय R. K. Krishna Kumar यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी निधन
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.