कार्तिक शुद्ध द्वादशीपासून घरोघरी तुळशीच्या विवाहाची (Tulsi Vivah 2022) लगबग सुरु होते. दिवाळी संपल्यावर तुळशी विवाह (Tulsi Vivah) करतात. तसेच तुळशीचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. अंगणात तुळशीचे रोप असावे त्यामुळे घरात सुख सम्रुद्धी नांदते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच दिवाळीनंतर तुळशीच्या लग्नाला देखील हिंद धर्मात खूप महत्व आहे. या दिवसापासून विवाह, गृहप्रवेश, या सर्व मुहूर्तांना सुरुवात होते. तर आज आम्ही या बातमी मधून तुम्हाला तुळशी विवाह कधी ? शुभ मुहूर्त बद्दल सांगणार आहोत.
हे ही वाचा : Diwali 2022 : दिवाळीत स्पेशल घ्या… मुलांसाठी ट्रेंडी कपडे
वृंदा म्हणजे तुळशी तिचे लग्न जलंधर नावाच्या राक्षसाशी करण्यात आला. तसेच वृंदा ही पतिव्रता स्त्री होती. तिची भक्ती आणि पुजेमुळे तिचा पती जलंधराचा विजय होत गेला आणि त्याला आपल्या विजयावर त्याला गर्व वाटू लागला त्यानंतर तो देवी देवतांना आणि लोकांना खूप त्रास देत होता. त्यांनतर सर्व देवी देवता जलंधराचा मृत्य साठी विष्णू देवतांकडे प्रार्थना करायला लागले. त्यानंतर भगवान विष्णूंनी मायाजालचा वापर करत जलंधरचे रूप धारण केले आणि वृंदाच्या पतिव्रता धर्माला नष्ट केले याचा परिणाम म्हणून जलंधरची शक्ती संपत गेली आणि तो युद्धात ठार मारण्यात आला.पण जेव्हा वृंदाला हे समजले तेव्हा तिने विष्णूंना प्रश्न केला की तुमची जन्मभर पुजा, तपस्या केली तर तू माझ्यासोबत असे का केले. पण तिला काय तिचा प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. नंतर ती जालंदरासोबत सती गेली. आणि वृंदाच्या राखेतून एक झाड बनवून बाहेर आली. त्यावेळी विष्णूने त्या झाडाचे नाव तुळशी असे ठेवले असते. आणि तिला असे वरदान दिले असते की तुळशीशिवाय मी कोणत्याही प्रकारचा प्रसाद ग्रहण करणार नाही. तेव्हा पासून तुळशी विवाह चालू होतो. आणि या दिवशी लवकर उठून आंघोळ करून नवीन कपडे घालून ऊस , बोरे हा प्रसाद वाटला जातो.
तुळशी विवाह (Tulsi Vivah) कार्तिक पौर्णिमेपर्यंत अर्थात त्रिपुरी पौर्णिमेपर्यंतच्या काळात तुळशीचा विवाह करता येतो. प्रामुख्याने कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह केला जातो. तुळशी विवाह (Tulsi Vivah) हा अगदी घरच्या विवाह समारंभाप्रमाणे अंगणातील तुळशीचा विवाह केला जातो. तसेच विवाह झाल्यानंतर बाकी लोकांना जेवण देखील असते. तुळशीचा विवाह हा ऊसा सोबत केले जाते. तसेच या वेळी तुळशी विवाह (Tulsi Vivah) शनिवार ५ नोव्हेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ६:०८ वाजता सुरू होईल आणि २६ नोव्हेंबर (November) २०२२ रोजी संध्याकाळी ५:०६ वाजता संपेल.
हे ही वाचा :
Diwali 2022 : दिवाळीत बनवा घरच्या घरी स्वादिष्ट सोनपापडी