spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Datta Jayanti 2022 तुम्हाला माहित आहे का त्रिमुर्ती प्रभु दत्तात्रेय उदयास कसे आले ?

ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांच्या पत्नींना (देवी सावित्री, देवी लक्ष्मी, देवी पार्वती) आपापल्या पतिधर्मावर अत्यंत गर्व होता आणि त्या सतत त्याचे गुणगान देखील गात असत.

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो. दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती. दत्त म्हणजे ‘आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत’, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे.

पौराणिक कथा – 

ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांच्या पत्नींना (देवी सावित्री, देवी लक्ष्मी, देवी पार्वती) आपापल्या पतिधर्मावर अत्यंत गर्व होता आणि त्या सतत त्याचे गुणगान देखील गात असत.

एकदा नारदमुनी तिनही लोकांत भ्रमण करीत करीत त्यांच्याजवळ येतात. त्यासमयी त्या तिन्ही देवींचे आपापले पतिधर्माचे गुणगान सुरू असते. तेव्हां नारदमुनी त्यांना अत्रीऋषींच्या पत्नी ‘अनुसुये’ बद्दल अवगत करतात. अनुसुया त्या तिघींपेक्षा देखील उत्तम रितीने पतिधर्म पाळते आहे हे नारदमुनींच्या तोंडुन ऐकुन त्यांचा जळफळाट होतो आणि तिचा पतिधर्माचा भंग करण्याकरीता त्या तिनही देवी आपापल्या पतीला आग्रह करतात.

स्त्रीहट्टापुढे ब्रम्हा, विष्णु आणि महेश या तिनही देवांचा नाईलाज होतो आणि ते तिघेही भिक्षेकारांच्या रूपात अ़त्रीऋषींच्या आश्रमासमोर जाऊन उभे राहातात. ‘ओम् भवती भिक्षांदेही’ असा आवाज ऐकुन अनुसुया माता आश्रमाबाहेर येते आणि त्या तिनही भिक्षेकारांना भिक्षा देऊ लागते त्यावेळी ते तिघे म्हणतात ‘आम्हाला भिक्षा नको आम्हाला भोजन हवे आहे ‘अनुसुया त्यांना आश्रमात बोलवते आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागते. स्वयंपाक होताच ती ज्यावेळी त्यांच्याकरता ताट वाढु लागते त्यावेळी ते तिघे म्हणतात आम्हाला भोजन नको ‘‘जोपर्यंत तु नग्न होऊन आम्हाला वाढणार नाही तोपर्यंत आम्ही जेवणार नाही’’.

अत्रीऋषींची पत्नी अनुसुया ही साधारण स्त्री नव्हती ती एक पवित्र पतिव्रता होती. ही साधारण माणसं नसुन आपली परिक्षा घेण्याकरता आली असल्याचे तिने जाणले आणि त्यांच्या ईच्छेचा आदर ठेवत आपल्या पतिचे स्मरण करून त्या तिघांवरही पाणी शिंपडले त्याक्षणी ती तिघेही बाळे झालीत आणि रांगु लागली. अनुसुयेने त्या तिघाही बालकांना आपले दुध पाजले. बाहेरून आल्यानंतर अत्रीऋषींना झालेला प्रकार लक्षात आला.

बरेच दिवस झाले परंतु आपले पति घरी आले नाहीत या चिंतेने त्या तिनही देवींना आपली चुक लक्षात आली त्यांनी अनुसुया मातेला क्षमा मागीतली त्यावेळी अनुसुया माता म्हणाली ‘या तिघांना मी माझे दुध पाजले आहे. ही तिघेही माझी बालके झाली आहेत त्यामुळे यांना माझ्याजवळच राहावे लागेल त्यावेळी तीनही भगवान आपल्या प्रत्यक्ष रूपात अवतरीत झाले आणि आपापल्यातुन एक अंश काढुन एक नवा अवतार तयार केला. त्रिमुर्ती प्रभु दत्तात्रेय उदयास आले…..

हे ही वाचा : 

Datta Jayanti 2022 दत्त जयंतीनिमित्त जाणून घ्या पूजा करण्याची पद्धत

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss