यंदा आषाढी एकादशीची तिथी १७ जुलैला असणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जण आषाढी एकादशीला उपवास ठेवून उपवासाचे विविध पदार्थ करतात. उपवासाला आपण साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे, भगर, रताळे असे उपवासाचे पदार्थ खाण्याला प्राधान्य देतो. बहुतेक लोक बनवायला सोपी असणारी साबुदाण्याची खिचडीच बनवतात. आषाढी एकादशीनिमित्त घराघरात खिचडी बनवायची तयारी सुरु केली असेलच, पण आज आपण साबुदाण्यापासून खमंग थालीपीठ कसे बनवायचे हे जाणून घेऊया. उपवासाचे थालीपीठ हे बवायला अगदी सोपे आणि चविष्ट असतात.
साबुदाण्यापासून खमंग थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- भिजवलेले साबुदाणे- ३ वाट्या
- उकडलेले बटाटे- ३
- हिरव्या मिरच्या- ५ ते ६
- भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट- १ वाटी
- जिरे- १ टी स्पून
- मीठ चवीनुसार
- तेल किंवा साजूक तूप गरजेनुसार
- थालीपीठ बनवण्यासाठी प्लॅस्टिकचा पेपर
कृती:
- सर्वप्रथम साबुदाणे ३ ते ४ तासांसाठी भिजवून ठेवावे.
- एका भांड्यात भिजवलेले साबुदाणे घेऊन त्यात उकडलेले बटाटे कुस्करून टाका.
- मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या व जिरे घेऊन त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी.
- तयार केलेली मिरचीची पेस्ट साबुदाणे व बटाटयाच्या मिश्रणात एकत्र करून घ्या.
- नंतर त्यात भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि मीठ टाकून एकजीव करून घ्या.
- आता हे तयार केलेले मिश्रण हाताने मळून घ्या.
- तयार मिश्रणाचे चपातीच्या गोळ्याएवढे गोळे करून घ्या.
- एका पोळपाटावर प्लास्टिकचा पेपर घेऊन त्यावर तेलाचे काही थेंब टाकून पसरून घ्या.
- तयार पिठाचे गोळे त्या कागदावर हाताच्या बोटाच्या साहाय्याने गोलाकार थापून घ्या.
- गोलाकार आकारात थालीपीठ थापून घेतल्यानंतर तव्यावर घालून खरपूस भाजून घ्या.
- तव्यावर आपल्या आवडीनुसार तेल किंवा तूप सोडावे आणि थापलेले थालीपीठ भाजून घ्या.
- उपवासासाठी तयार केलेले थालीपीठ दह्याबरोबर खायला तयार आहेत.
हे ही वाचा :
Lonavala Bhushi Dam Tragedy: पावसाळ्यात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नेमक्या उपाययोजना काय?: Nana Patole
Ambadas Danve यांना शिवीगाळ भोवली; पाच दिवसांसाठी विधान परिषदेतून निलंबित
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.