आजकालच्या धावपळीमुळे आपण आपल्या जीवनशैली वर लक्ष देत नाही. त्यामुळे बरेच आजारांना आपण नियंत्रण देतो. जास्त काम असल्यामुळे ताणतणाव वाढतो आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. आरोग्यासाठी फक्त योग्य पोषक आहार करणे गरजेचे नाही. त्याच बरोबर आपण जेवणा नंतर काय काम करतो ? काय कराला पाहिजे ? हे देखील माहित असणे गरजेचे आहे. काही वेळा आपण जेवणानंतर आपण अशा काही गोष्ठी करतो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. आणि अनेक आजार मागे लागतात. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून जेवणानंतर कोणती कामे करू नये ते सांगणार आहोत.
हे ही वाचा : डाळींब खाणे आरोग्यासाठी उपयुक्त
काही लोक जेवल्यानंतर लगेच झोपतात. परंतु जेवल्यानंतर २ तासांनी झोपावे. जर तुम्ही जेवणानंतर लगेच झोपायला जात असलात तर ते टाळा. कारण त्यामुळे ऍसिडिटी , आणि लठ्ठपणा वाढण्याचा धोका असू शकतो. लठ्ठपणा वाढल्यास हृदय संभंधित आजार देखील वाढू शकतात.
जेवणानंतर कधीही चहा पियू नये. त्यामुळे रेड ब्लड सेल्सची समस्या असू शकते.
जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. त्यामुळे अन्न पचनास जड जाते. आणि जेवणानंतर पाणी बसून पिणे उभे राहून पिल्यास पोटदुखी होऊ शकते. आणि पोटाचे आजार देखील वाढू शकतात.
जेवणानंतर लगेच फळे सेवन करू नये. फळे लगेच सेवन केल्याने अन्नातील पोषक तत्वे शरीराला मिळत नाही. त्यामुळे फळे लगेच सेवन करू नये.
जेवण केल्यानंतर दारू किंवा सिगरेट पिऊ नये. यामुळे आरोग्याला मोठे नुकसान होऊ शकते.
जेवणानंतर लगेच चालू नये. थोड्यावेळाने चालावे. लगेच चालल्याने अपचनाची समस्या निर्माण होते.
हे ही वाचा :
तांब्याच्या भांड्यात पाणी प्या आणि ‘या’ आजारांपासून रहा दूर