डोळ्यांचे आरोग्य जपणे फार गरजेचे आहे. डोळे हा नाजूक अवयव आहे. तसेच डोळे हा शरीराचा महत्वाचा भाग आहे. डोळे मेंदूसी जोडले गेलेले असतात. हे मेंदूला सांगत असतात की कोण कुठे आहेत ? आणि काय करत आहेत ? पण तुम्हाला माहित आहे का आपल्याला काही आजरांमुळे डोळ्यांवर काही परिणाम घडू शकतात. त्यामुळे डोळ्याचे विकार जास्त उद्भवतात आणि डोळ्यांची दृष्टी देखील कमी होते.
हे ही वाचा :
सध्या डोळ्यांची साथ पसरत चालली आहे, तर अशी घ्या डोळ्यांची काळजी
एखाद्या माणसाला मधुमेहाची समस्या असेल तर त्यांना उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते. मधुमेहाचा संबंध डोळ्यांशी देखील असतो. मधुमेह जास्त प्रमाणत असल्यास डोळयांची रक्तवाहिन्यांमध्ये दाब पडू शकत. कधी कधी रक्तदाब वाढल्यास तो कुठून तरी गळायला लागतो आणि डोळ्यांची दृष्टी कमी होते.
मोतीबिंदू हा डोळ्यांचा एक आजार आहे. यामध्ये रेटिनावर पांढरी किंवा काळी जाळी तयार होते, त्यामुळे कमी दिसते, आणि अंधुक दिसायला लागते. पण मधुमेह असल्यास मोतीबिंदू होण्याची शक्यता जास्त असते. मोतीबिंदू झाल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे. मोतिबिंदू ओप्रेशनच्या मदतीने काढण्यात देखील येतो.
मधुमेह वाढल्यास डोळ्यांचा त्रास वाढतो. आणि त्यांचा परिणाम डोळ्यांच्या लेन्स वर दिसून येतो. यामुळे डोळे खराब होण्याची शक्यता असते.
जर तुम्ही डोळयांसाठी लेन्स वापरत असाल तर त्यामुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतो आणि डोळ्यांना खाज येऊ शकते , डोळे लाल होऊ शकतात. त्यामुळे डोळयांसाठी लेन्स वापरू नये.
जर तुम्ही जास्त ताण घेत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या डोळ्यांवर होऊ शकतो.
सतत फोन , कॉम्प्युटर ,लॅपटॉप , वापरल्याने डोळे खराब होतात. आणि डोळे लाल होतात.
डोळे येणे म्हणजे अचानक डोळयांची जळजळ, दुखणे, पाणी व घाण येणे, पापण्या चिकटणे व प्रकाश सहन न होणे. असे असल्यास डोळे येतात.