Wednesday, September 4, 2024

Latest Posts

वजन कमी करु इच्छिता परंतु होत नाही ; तर दैनंदिन जीवनात करा ‘हे’ बदल

दररोजच्या आहार विहारांमध्ये जर आपण बदल केला तरं खूपच फायदे आहेत. जसे की, मानसिक ताण तणाव, अपचन, गँस, पोटाचे विकार, पित्त (ऍसिडिटी), बद्धकोष्ठता, पचनसंस्थेतील आजार, सर्व प्रकारचे त्वचारोग, डोकेदुखी (मायग्रेन), मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा (वजन कमी करणे), मसल्स् पेन अथवा व्हेरिकोज व्हेन्स. या आणि अशा २५ हुन अधिक प्रकारचे आजार हे केवळ आपल्या चुकीच्या आहार पध्दतीमुळे होत असतात. दैनंदिन जीवनात जर बदल केले तरच आपले वजन कमी होऊ शकते.

सकाळी ९ ते १० वाजता :

एक ज्वारीची भाकरी याच प्रमाण जेवणात कमीत कमी ४०% असणे आवश्यक आहे. भाज्या व कच्चा आहार घेणे गरजेचे सोबतच ३०% शिजवलेले अन्न पोटात गेले तरी वजन कमी होण्यास मदत होते.

दुपारी १ वाजता :

जवळपास १०० % फलाआहार गरजेचं असतो. जर ते शक्य माही झाले तर तुम्ही फळांचा रस किंवा मोड आलेले कडधान्यसुद्धा खाऊ शकता.

सायंकाळी ६ ते ७ वाजता :

दलिया किंवा ज्वारीची भाकरी याच जेवणात प्रमाण हे ३०% तर भाज्या ७०% असाव्यात.

 पाणी कसं आणि किती प्यायचं :

जेवणानंतर साधारण १ ते दीड लिटर पाणी पिले पाहिजे. जेवताना पिवू नये. सकाळी उपाशीपोटी ३ ग्लास कोमट पाणी आणि रात्री झोपताना १ ग्लास कोमट पाणी पिले पाहिजे.

 आहारातील महत्वाच्या सुचना :
  • रात्री खूप उशिराने जेवणे बंद केले तर उत्तमच राहील
  •  दूध टाकलेला चहा बंदच करणे गरजेचे आहे.
  •  फास्टफूड खाणे संपूर्णतः बंद केले पाहिजे.
  •  बेकरीतील पदार्थं सुद्धा बंदच करावेत.
  •  प्रक्रिया केलेले सर्वच पदार्थं बंद करणे गरजेचे आहे.
  •  अवेळी खाणे बंद करणे गरजेचे आहे.
  •  डबा बंद पदार्थंही बंद करणे गरजेचे आहे.
  • बाटलीतील थंड पेय न पिले फारच गरजेचे आहे.
  •  मासाहारी (नॉनव्हेज) पदार्थं बंद केले तर उत्तम होऊ शकते.
विहारामध्ये काय करायचे मग काय करायचे :
  • सकाळी किमान ४५ मिनिटं पायी न बोलता फास्ट चालणे
  • भस्रीका व अनुलोम विलोम १५-१५ मिनिटे करणे
  • कपालभाती प्राणायाम १५ मिनिटं करणे
  • सकाळ संध्याकाळ १५-१५ मिनिटे सूर्यनमस्कार
  •  ध्यानधारणा १५-१५ मिनिटं सकाळी संध्याकाळ करणे
 यामुळे काय फायदे होतील ?

हे दैनंदिन बदल कमीत कमी ३ महिने केले तर कोणताही आजार जास्त वेळ शरीरात दिकणार नाही. तसेच रक्तदाब, मधुमेह नॉर्मल ठेवण्यासाठी ही याचा वापर होऊ शकतो. लठ्ठपणा १ महिन्यात ३/४ किलो वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. त्याशिवाय नियमित योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यान, आहार व निसर्गोपचार (नैसर्गिक उपचार) पद्धतीद्वारे तुम्ही निरोगी, आनंदी आणि दीर्घायुष्यी राहण्यास मदत होऊ शकते.

हे ही वाचा:

घटस्फोटाची घोषणा करत HARDIK PANDYA यांनी केले चाहत्यांना आवाहन

Navi Mumbai NH 3: ॲक्सेस कंट्रोल मार्गामुळे शहरातून बाहेर पडण्यासाठी लागणार फक्त १५ मिनिटे, शहरांतर्गत वाहतूक आता होणार बंद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss