लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर;सिक्कीम,ओडिशा,अरुणाचलमध्ये एकाच वेळी होणार मतदान

निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर करण्यात आल्या.

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर;सिक्कीम,ओडिशा,अरुणाचलमध्ये एकाच वेळी होणार मतदान

निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर करण्यात आल्या. निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये देशभरातील सर्वच राज्यांमधील तारखा जाहीर करण्यात आल्या. महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यात निवडणूक होणार आहे.तर सिक्कीम, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये एकाच वेळी निवडणूक पार पडणार आहे. आंध्र प्रदेशमध्ये १८ एप्रिलला अधिसूचना निघाल्यानंतर १३ मे रोजी मतदान होणार आहे. तर अरुणाचलमध्ये १९ एप्रिलला मतदान होणार आहे. ओडिशामध्ये १८ एप्रिलला पहिली अधिसूचना काढल्यानंतर १३ मे रोजी मतदान होणार आहे.

निवडणूक आयोगाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राजीव कुमार यांनी मतदारांना आवाहन केले आहे. राजीव कुमार म्हणाले, आम्ही मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करतो. कारण हा तुमचा धर्म आहे. शिवाय प्रत्येकाला समतल खेळाचे मैदान उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या जात आहेत. राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचारात वैयक्तिक हल्ले टाळावेत. शत्रुत्व जरूर करा पण वाव असला पाहिजे, जेव्हा जेव्हा आपण मैत्री करू तेव्हा लाज वाटू नये.निवडणूक आयोगाकडून सर्व राजकीय पक्षांना निवडणुकीच्या खर्चाचा आवाहल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी २१०० निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात याकडे निरीक्षकांचे लक्ष राहणार आहे. तसेच सुरक्षा दलांचा बंदोबस्त नीट आहे का, याकडेही लक्ष असणार आहे.

मागील ११ विधानसभा निवडणुकीमध्ये ३४०० कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. तसेच यावेळी देखील अयोग्य पैशांच्या शक्तीला आळा घालण्यासाठी कटिबद्ध करण्यात आले आहे. मसल पॉवर, मनी पॉवर, चुकीची माहिती आणि उल्लंघन ही आयोगासमोरील चार प्रकारची मुख्य आवाहने आहेत. याला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे. निवडणूक आयोगाने म्हटले आहे, मसल पॉवरवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. मनी पॉवरवर आम्ही कडक कारवाई करणार आहोत. चुकीची माहिती रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. अफवा पसरविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आयटी कायद्याच्या कलम ६९ आणि ७३ अंतर्गत, सर्व अधिकृत अधिकारी सोशल मीडिया पोस्ट काढून टाकण्याचे आदेश देऊ शकतात. जर कोणी खोट्या पोस्ट टाकल्या तर अशा लोकांवर कारवाई केली जाणार आहे. निवडणूक आयोग मिथ विरुद्ध रिॲलिटी नावाची वेबसाईट लॉन्च करणार आहे, जेणेकरून प्रत्येकाला वास्तव कळेल. सोशल मीडियावर जी काही माहिती येते, ती सर्वसामान्यांनी पाहावी आणि फॉरवर्ड करावी. शेवटची समस्या म्हणजे निवडणूक प्रक्रियेचे उल्लंघन. आम्ही राजकीय पक्षांना आमचे मार्गदर्शक तत्त्वे स्टार प्रचारकांना देण्यास सांगितले आहे. आचारसंहितेचा भंग झाल्यास कारवाई केली जाईल, असे राजीव कुमार म्हणाले.

हे ही वाचा:

‘अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या पोस्टर प्रदर्शित,थरारपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

मथरा-वृंदावनातील आगळी-वेगळी होळी,जाणुन घ्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version