लोकसभा निवडणूका तोंडावर असतांना काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांना ईडीकडून अटक करण्यात आली. त्यांना करण्यात आलेल्या अटकेविरोधात दिल्ली येथील रामलीला मैदानावर भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासह अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल तसेच शरद पवार हे देखील उपस्थित होते. त्याआधी दिल्ली येथील आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली. त्यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले. संजय राऊत म्हणाले, सगळे ठग भाजपमध्ये गेले, त्यामुळे आम्ही ठगमुक्त झालो आहोत. यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मद्य घोटाळ्याचे आरोपी अरविंद केजरीवाल यांच्या बचावासाठी आयोजित ‘ठगो का मेला‘ कार्यक्रमासाठी उबाठा गटाचे नेते आणि टोमणेसम्राट उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचले आणि टोमणे मारण्याचा कार्यक्रम केला.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
देवेंद्र फडणवीस यांचा जाण्या येण्याचा खर्च मी करतो, त्यांनी मणिपूरला जावं, त्यांनी लडाखला जावं, पण त्यांनी तिथे जाऊन परिस्थिती पाहावी, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मी खर्च तयार करायला तयार आहे. त्यांनी एखादा बॉलिवूड निर्माता शोधून मणिपूर फाईल्स चित्रपट काढावा,असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांचा येण्या-जाण्याचा, राहण्या-खाण्याचा खर्च मी स्वतः करतो, पण त्यांनी मणिपूर आणि लडाखला जाऊन यावं, त्यांच्या सर्व खर्च मी करतो, त्यांच्या हॉटेलचा खर्च देखील मी करतो. पण त्यांनी मणिपूर आणि लडाखला जाऊन तेथील परिस्थिती पाहावी. देवेंद्र फडणवीस यांनी अरुणाचल प्रदेश आणि दार्जिलिंगला जावं. निर्वासित काश्मिरी पंडितांना भेटावं. बॉयकॉट बॉलीवूड म्हणणारे बॉलीवूडच्या नादी लागलेत, त्यामुळे एखाद प्रोड्युसर घेऊन त्यांनी मणिपूर फाईल्स चित्रपट काढावा, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
संजय राऊत यांचं मत काय होतं?
हे ही वाचा:
अंध मतदारांच्या सोयीसाठी असणार Braille Voter Information Slip
विकसित भारताच्या निर्मितीमध्ये रत्न आभूषण निर्यात क्षेत्राची भूमिका मोठी- Mukesh Ambani
Follow Us