लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचं मतदान २० मे रोजी पार पडणार आहे. त्यासाठी आज महाप्रचारासाठी सांगता सभा होणार असून महायुतीची दादर येथील शिवाजपार्क येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendramodi)आणि राज ठाकरे (Raj thackeray)यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगता सभा पार पडणार आहे. यावर “आमची सभा होऊ नये म्हणून प्रधानमंत्री आणि सुपारीबाज बोलवण्यात आले”. असं म्हणत मोदींसह राज ठाकरेंवर संजय राऊत यांनी टीका केली.
आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी आज होणाऱ्या महायुतीच्या सभेबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की,”शिवतीर्थावर सभा व्हावी यासाठी आम्ही प्रथम अर्ज केला. मात्र,आमची सभा होऊ नये म्हणून प्रधानमंत्री आणि सुपारीबाजला बोलवण्यात आले. हा सत्तेचा गैरवापर सुरु आहे.”असं म्हणत टीका केली. तर आज आमची बीकेसी येथे सभा होणार आहे. त्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, कॉंग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे येणार असून उद्धव ठाकरे, शरद पवार सभेला संबोधित करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की,”प्रधानमंत्री मुंबईत येऊन इतक्या सभा घेतात म्हणजे तुम्ही दहा वर्षात काही केलं नाही म्हणून येत आहेत.लोकांना मूर्ख बनवण्यासाठी तुम्ही महाराष्ट्रात येत आहात.ज्यांच्यावर टीका केल्या त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायला लागलं नसतं.महाराष्ट्रात पंतप्रधान येऊद्या किंवा अजून कोणी आम्हाला फरक पडत नाही.”अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर पहिल्यांदा पंतप्रधानांसोबत एकत्रितपणे सभा होणार आहे.त्यावर,”या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील काही दुकाने बंद होणार आहेत.त्यातील राज ठाकरेंचं एक दुकानं आहे. तीन-चार सुपारी शोप इन पॉलिटिक्स बंद होणार आहेत. महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही असं ठामपणे कोणी तरी सांगितलं होतं आणि आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसावे लागत आहे. राज ठाकरे ज्यांच्याबद्दल सवाल उठवतात, त्यांच्याबरोबरच जातात ही राज ठाकरे यांची खासियत आहे”अशा शब्दात राज ठाकरेंवर शाब्दिक हल्लाबोल केला.
दरम्यान, “महाराष्ट्रामध्ये अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्याविरोधात संतापाची लाट आहे. या दोघांनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या ढोंगी आणि भंपकपणा विरोधात संतापाची लाट आहे. महाराष्ट्रात भाजपचे नुकसान हे देवेंद्र फडणवीसांमुळेच होत आहे. महाराष्ट्रातील जनता त्यांचा तिरस्कार करत आहे हे सगळ्यांना ४ जूनला समजेल.”असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
हे ही वाचा:
Follow Us