समृद्धी महामार्गावरून वर्षभरात ५८ लाख वाहनांचा प्रवास

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या नागपूर – शिर्डी या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ रोजी झाले होते.

समृद्धी महामार्गावरून वर्षभरात ५८ लाख वाहनांचा प्रवास

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या नागपूर – शिर्डी या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ रोजी झाले होते. वर्षभरात या मार्गावरून ५८ लाख १ हजार १५४ वाहनांनी प्रवास केला आहे. तर, या वाहनांकडून ४२२ कोटी ९ लाख ७९ हजार ३९९ रुपये पथकर वसूल करण्यात आला आहे.

राज्याची राजधानी आणि उपराजधानी यामधील प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ७०१ किमीचा समृद्धी महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. हा महामार्ग आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अनेक कारणांनी कामास विलंब झाला असून एमएसआरडीसीने टप्प्याटप्प्यात हा मार्ग खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी हा ५२० किमीचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात आला. तर, मे २०२३ मध्ये शिर्डी – भरवीर अशा ८० किमीच्या टप्प्याचे लोकार्पण झाले होते.

मुंबई-नागपूर द्रुतगती मार्ग ७०१ किमी लांबीचा आणि सहा पदरी द्रुतगती मार्ग आहे. एक्सप्रेसवे अधिकृतपणे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग म्हणून ओळखला जातो. ती ३९० खेड्यांमधून पुढे जाते आणि महाराष्ट्रातील दहा जिल्हे ओलांडते. यामुळे मुंबई ते नागपूर दरम्यानचा प्रवास वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. या ग्रीनफिल्ड प्रकल्पाची घोषणा २०१५ मध्येही करण्यात आली होती आणि 2017 मध्ये भूसंपादनाला सुरुवात झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर २०१८ मध्ये मुंबई नागपूर द्रुतगती मार्गाची पायाभरणी केली होती.

चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरचे अध्यक्ष म्हणाले, “सध्या मराठवाड्यात सहा प्रकारचे उद्योग प्रामुख्याने औरंगाबादच्या आसपास आहेत. त्यात वाहन घटक, अभियांत्रिकी, फार्मास्युटिकल, ब्रुअरी आणि अनेक स्वदेशी आयटी कंपन्या समाविष्ट आहेत. मुंबई-नागपूर द्रुतगती मार्ग खुला झाल्यावर या आयटी कंपन्यांना विस्तारासाठी बाह्य सहकार्य मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. यामुळे रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे आसपासच्या प्रदेशात निवासी जागांची मागणी वाढेल.”

हे ही वाचा:

rashtra/68147/”>जालन्यात धनगर समाज आक्रमक, धुळे-सोलापूर महामार्ग टायर पेटवून आंदोलन

कुणबी नोंदींची आकडेवारी जाहीर करू नका; शिंदे समितीची अधिकाऱ्यांना सूचना

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version