अजित पवार यांनी केली विरोधकांवर टीका

सध्या राज्याच्या राजकारणात नवनवीन घडामोडी या होत आहेत.

अजित पवार यांनी केली विरोधकांवर टीका

सध्या राज्याच्या राजकारणात नवनवीन घडामोडी या होत आहेत. त्यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. आमच्या विरोधकांना उकळ्या फुटतात आणि ते काहीपण चुकीच्या बातम्या पसरवतात असं म्हणत अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधी पक्षांवर टीका करत म्हंटले आहे. कारण नसताना मला ट्रोल केलं जात आहे. कंत्राटी भरतीच्या संदर्भात अजित पवार यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला होता, त्यावेळी ते बोले होते. सध्या राज्यात वेगवेगळ्या विभागात १ लाख ५० हजार मुला मुलींची भरती चालू आहे. पण विरोधक चुकीच्या अफवा पसरवत असल्याचे अजित पवार म्हणाले.

मी काल आरोग्य विभागाचा आढावा घेत होतो. अनेक ठिकाणी स्टाफ कमी आहे. तो स्टाफ भरण्याची प्रक्रिया चालू असल्याचे अजित पवार म्हणाले. शिक्षण विभागातही भरती करणार आहोत. ज्या ठिकाणी शिक्षकांची गरज आहे,त्या ठिकाणी निवृत्त झालेल्या शिक्षकांना आपण तात्पुरते घेतल्याचे अजित पवार म्हणाले. भरती तात्काळ करावी लागते नाहीतर काही जण लगेच कोर्टात जातात असे अजित पवार म्हणाले. सध्या विरोधक कारण नसताना आम्हाला बदनाम करण्याचं काम करत असल्याचे अजित पवार म्हणाले. आपण वेगवेगळ्या विभागात १ लाख ५० हजार मुला मुलींची भरती करणार आहोत. ही सगळ्यात मोठी भरती असणार आहे. आत्तापर्यंत एवढी मोठी भरती कोणत्याही सरकारच्या काळात झाली नव्हती असे अजित पवार म्हणाले.

आज आणि उद्या मंत्रीमंडळासह अधिकारी वर्ग छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. मी आज संध्याकाळी संभाजीनगरमध्ये जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. संभाजी नगर मध्ये गेल्यानंतर काही महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. मराठवाड्यातील जे आठ जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांच्या विकासाच्या संदर्भात चर्चा होणार आहे. मराठवाड्यात पावसानं चांगलीच ओढ दिली आहे. अनेक भागात शेतकऱ्यांची पिकं करपून गेली आहेत. राज्यातही काही भागात अशी स्थिती आहे. ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, तिथं स्थिती चांगली आहे. हवामान विभागानं आणखी चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची यासंदर्भात देखील प्रसारमाध्यमांनी अजित पवार यांना प्रश्न विचारले. यावेळी अजित पवार म्हणाले की, निवडणूक आयोगासमोर आम्ही आमची बाजू मांडणार आहोत. ज्यांना बोलावलं ते जाणार आहोत. आमची बाजू कशी उजवी हे आम्ही सांगणार असल्याचे अजित पवार म्हणाले.

Exit mobile version