समृद्धी महामार्गावर मागील काही महिन्यांपासून हजारोपेक्षा जास्त अपघात झाले आहेत. यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. तसेच काल रात्री छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) जांबरगाव टोल नाक्याजवळ समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway) भीषण अपघात झाला. घडलेला अपघात एवढा भीषण होता त्यामध्ये १२ प्रवाशांचा मृत्यू झाला आणि २३ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या नागिरिकंना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. या अपघातामध्ये निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. हे वृत्त वेदना दायी असे अजित पवार म्हणाले आहेत.
नागपूर समृध्दी महामार्गावर वैजापूर तालुक्यात जांबरगाव टोलनाक्याजवळ टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रकचा झालेला अपघात खूप भीषण होता. यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. हे वृत्त अंत्यंत वेदनादायी आहे. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तर या अपघातातील जखमींवर तातडीने, सर्वतोपरी उपचार शासकीय खर्चाने करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. या अपघातात मृत्यू पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्याबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत, असे अजित पवार म्हणाले आहेत.
हे ही वाचा:
‘किंग’ कोहलीकडून बाबर आझमला जर्सी भेट
फाल्गुनी पाठकच्या दांडियाच्या कार्यक्रमात १५६ तरुणांची फसवणूक