spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Akshay Shinde Encounter: शाळेचे संचालक मंडळ BJP, RSS संबंधित असल्यामुळे ‘त्यांना’ वाचण्यासाठी हा सगळा प्रकार केला जातोय का? Nana Patole यांनी उपस्थित केली शंका

Akshay Shinde Encounter: बदलापूर येथील शाळकरी अल्पवयीन झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर (Akshay Shinde Encounter) केल्याची घटना काल (सोमवार, २३ सप्टेंबर) घडली. आरोपीला तळोजा कारागृहातून बदलापूकडे घेऊन जात असताना आरोपीने पोलिसांकडून पिस्तूल हिसकावत तीन राउंड फायर केले. यादरम्यान पोलिसांनी सेल्फ डिफेन्ससाठी अक्षय शिंदेंवर गोळीबार केला. यात त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली असून राजकीय नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. याप्रकरणात विरोधकांनी संशय व्यक्त करत सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज (मंगळवार, २४ सप्टेंबर) यावर भाष्य करत ‘शाळेचे संचालक मंडळ बीजेपी (BJP), आरएसएस (RSS) संबंधित असल्यामुळे त्यांना वाचण्यासाठी हा सगळा प्रकार केला जातोय का?’ असा सवाल उपस्थित केला आहे.

काय म्हणाले नाना पटोले ?

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले, “पोलीसाची बंदुकीने आरोपी अक्षय शिंदेने स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला. अद्याप या प्रकरणातील सगळे आरोपी पकडलेले नाही. महिने लोटूनही आरोपी कुठे गेले अजून पत्ता लागलेला नाही. शाळेचा संचालक मंडळ बीजेपी आणि आरएसएसशी संबंधित असल्यामुळे त्यांना वाचण्यासाठी हा सगळा प्रकार केला जातोय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर आणावी. प्रकरणातील एकही आरोपी सुटू नये. सगळ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “ज्या जिल्ह्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्या जिल्ह्यात अशा पद्धतीच्या घटना होत आहेत. सरकार या प्रकरणात आरोपीला का वाचवायला निघाली आहे? आमचा या सरकारवर भरोसा नाही. सरकार पीडित मुलींना न्याय देऊ शकत नाही. हा पोलिसांचा निष्काळजीपणा नसून यात पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा या घटनेमागे हात आहे. रश्मी शुक्ला काय ऑर्डर देतात, याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. कोणालाही पाठीशी घालण्याचं काम या घटनेत होऊ नये. सगळ्या दोषींना कारवाई झाली पाहिजे,” असे ते यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

Akshay Shinde Encounter: आधी भरचौकात फाशी देण्याची मागणी मग आता त्या नराधमाविषयी एवढी आपुलकी कशी वाढली? Naresh Mhaske यांचा सवाल

Akshay Shinde Encounter: असे अजून दहा-पंधरा ठोकले तरी काय हरकत नाही पण…काय म्हणाले Nilesh Rane?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss