Thursday, July 4, 2024

Latest Posts

BJP सरकारविरोधात Congress करणार राज्यभर ‘चिखल फेको’ आंदोलन

महाराष्ट्र काँग्रेसकडून (Congress) शुक्रवार, २१ जून रोजी राज्यभर राज्य सरकारविरोधात (Maharashtra Government) आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यमध्ये वाढत असणारी बेरोजगारी, महागाई, NEET परिक्षेतील घोटाळा, खते-बियाण्यांचा काळाबाजार, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र काँग्रेसकडून (Congress) शुक्रवार, २१ जून रोजी राज्यभर राज्य सरकारविरोधात (Maharashtra Government) आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यमध्ये वाढत असणारी बेरोजगारी, महागाई, NEET परिक्षेतील घोटाळा, खते-बियाण्यांचा काळाबाजार, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत असताना महायुती सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलं आहे. तसेच, राज्य सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्ष २१ जून रोजी राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयी सकाळी अकरा वाजता सरकारच्या प्रतिमेस चिखल लावून ‘चिखल फेको’ आंदोलन करून भाजपाप्रणित सरकारचा निषेध करणार आहे.

याबाबत काँग्रेसकडून समाजमाध्यमांवर सविस्तर माहिती देण्यात आली, त्यात लिहिले आहे कि, “राज्यातील व केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, महिला, तरूण, गरिब व सामान्य जनतेच्या विरोधातील आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासण्याचे काम या सरकारने केले आहे. मागील १० वर्षापासून भाजपा सरकारने राज्यातील औद्योगिक विकासाला खिळ घातली आहे. सरकारी नोकर भरती केली जात नाही. स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीत, ह्या परीक्षा घेतल्या तर पेपरफुटीचे ग्रहण लागते, शेतकरी संकटात आहे पण त्यांना मदत दिली जात नाही. कांदा, कापूस, सोयाबीन यासह कोणत्याही शेतमालाला भाव नाही, सरकार एमएसपी देत नाही. कठिण काळात जनतेला मदत करण्याऐवजी सरकार जनतेचे शोषण आणि आर्थिक पिळवणूक करत आहे. NEET परिक्षेच्या पेपरफुटी व निकालातील गैरव्यवहारामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य सरकारने धोक्यात आणले आहे.”

सदर पोस्टमध्ये पुढे लिहिले कि, “महागाई, बेरोजगारी, पेपरफुटी, महिला सुरक्षा, खते, बि-बियाणांचा काळाबाजार, कर्जासाठी शेतकऱ्यांची होत असलेली अडवणूक, चिखलात सुरु असलेली पोलीस भरती, राज्यातील सरकारी रिक्त पदे भरण्याबाबत चालवलेली चालढकल, राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. श्रीमंतांची पोर गोरगरिबांना गाड्याखाली चिरडून मारत आहेत. मुलींचे दिवसाढवळ्या रस्त्यावर खून पाडले जात आहेत. सत्ताधारी पक्षाकडून जाती धर्माच्या नावाखाली सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या सरकारच्या विरोधात जनतेत तीव्र संताप असून सरकारला जाब विचारण्यासाठी आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील प्रमुख नेते, माजी मंत्री, खासदार, आमदार, माजी खासदार, माजी आमदार, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआय, सेवादल, इंटक, सेल व विभाग यांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन भाजर सरकारचा निषेध करणार आहेत.”

हे ही वाचा

NDA चे सरकार कोसळणार… सरकार मधील घटक पक्ष आमच्या संपर्कात ; राहुल गांधी

पाकिस्तान हृदयसम्राट मिया Uddhav Thackeray, शिवसेना वर्धापनदिनी Nitesh Rane यांचे टीकास्त्र

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss