‘रीड लातूर’ उपक्रम राबवण्यासाठी जिल्हाभरातून मागणी, धिरज विलासराव देशमुख यांनी वाचन चळवळ निर्माण करून दिली सर्वाना प्रेरणा

वाचन संस्कृती जोपासली जावी व त्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'रीड लातूर' उपक्रमाच्या माध्यमातून खूप चांगला सकारात्मक बदल समाजामध्ये दिसून येत असून ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेतील अवांतर वाचनाची पुस्तके नियमितपणे वाचत असल्याने त्यांचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

‘रीड लातूर’ उपक्रम राबवण्यासाठी जिल्हाभरातून मागणी, धिरज विलासराव देशमुख यांनी वाचन चळवळ निर्माण करून दिली सर्वाना प्रेरणा

वाचन संस्कृती जोपासली जावी व त्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘रीड लातूर’ उपक्रमाच्या माध्यमातून खूप चांगला सकारात्मक बदल समाजामध्ये दिसून येत असून ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेतील अवांतर वाचनाची पुस्तके नियमितपणे वाचत असल्याने त्यांचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता रीड लातूर उपक्रमाची मागणी लातूर जिल्ह्यातील विविध शाळांमधून होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा उपक्रम अधिक मोठ्या प्रमाणात रुजला जावा यासाठी जे काही सहकार्य आवश्यक असेल ते निश्चितपणे आपण करू अशी ग्वाही देऊन, आ.धिरज विलासराव देशमुख व दीपशिखा धिरज देशमुख यांनी पुस्तक वाचना विषयी जी चळवळ सुरू केली आहे ती सर्वांना प्रेरणा देणारी असल्याचे गौरवउदगार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी काढले.

वाचनसंस्कृतीस चालना देत असताना रीड लातूर उपक्रमात सहभागी होवून वाचन चळवळीला आकार देत असलेल्या शिक्षक व शाळांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. पुढे बोलताना श्री अनमोल सागर म्हणाले की, ग्रामीण भागात वाचन संस्कृती रजवणे एवढी सोपी बाब नाही. ग्रामीण भागातील मुलांसाठी रीड लातूर उपक्रम हितकारक ठरत असल्याचे सांगून आ. धिरज देशमुख,सौ.दीपशिखा देशमुख व रीड लातूर टीमला भविष्यातील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. सत्कार सोहळ्यात आमदार धिरज विलासराव देशमुख आपल्या मनोगत म्हणाले की, ग्रामीण भागातील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. आधी 2G, नंतर 3G ,4G, 5G… भविष्यात 6G,7G सुद्धा येतील; पण एका G ला पर्याय नाही, ते म्हणजे ‘गुरु G’ एवढे महत्त्व शिक्षकांचे असून यातून एक स्पष्ट होते की,शिक्षकांनी विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी कायम ठेवत अनेक वेगवेगळे उपक्रम शाळेत राबवले आहेत.

आपला विद्यार्थी जिवनातील कोणत्याही स्पर्धेत मागे न राहता जीवनातील प्रत्येक स्पर्धेस तो यशस्वीपणे सामोरे जावा यासाठी जे काही चांगले करता येईल त्याचा स्वीकार शिक्षकांनी नेहमीच केला आहे. त्याच विचाराने रीड लातूर हा उपक्रम शिक्षकांनी आपला उपक्रम मानून हाती घेतला म्हणूनच यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.वाचनामुळे आपल्या विचारांमध्ये खूप चांगला बदल घडत असतो,वाचनामुळे जगाचे ज्ञान आपणास मिळते व त्यातून व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यास मदत होते. हे अनेकांनी पहिले व अनुभवले आहे. मराठी, इंग्रजी व हिंदी पुस्तकांच्या वाचनातून शब्दसाठा समृद्ध होऊन विचाराला ऊंची प्राप्त होते. म्हणूनच मुलगा वंश व मुलगी दिवियाना यांना आपण आवर्जून पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहन देत असतो असे आमदार धिरज विलासराव देशमुख आपल्या मनोगत म्हणाले.

हे ही वाचा:

अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रामदास आठवले यांची पहिली प्रतिक्रिया, संजय राऊतांवर बोचरी टीका करत म्हणाले…

Akshay Shinde चा घात की घातपात? एन्काऊंटरची स्क्रीप्ट कोणाची?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version