Devendra आणि Amruta Fadnavis यांच्या आगळ्यावेगळ्या लव्ह स्टोरीबद्दल तुम्हाला माहित आहे का?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांची प्रेमकहाणी फार खास आहे. या दोघांकडे एक 'पॉवर कपल' म्हणून पाहिले जाते.

Devendra आणि Amruta Fadnavis यांच्या आगळ्यावेगळ्या लव्ह स्टोरीबद्दल तुम्हाला माहित आहे का?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांची प्रेमकहाणी फार खास आहे. या दोघांकडे एक ‘पॉवर कपल’ म्हणून पाहिले जाते.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांची प्रेमकहाणी फार खास आहे. या दोघांकडे एक ‘पॉवर कपल’ म्हणून पाहिले जाते. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अमृता रानडे आणि देवेंद्र फडणवीस यांची फिल्मी लव्ह स्टोरी थोडक्यात जाणून घेऊया.

देवेंद्र फडणवीस यांनी कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता, जे त्यांच्या आईला मान्य नव्हते. देवेंद्र फडणवीसांना देव, देश आणि धर्मसाठीच संपूर्ण आयुष्य घालवायचे असा त्यांचा विचार होता. देवेंद्र जेव्हा दुसऱ्यांदा आमदार झाले तेव्हा त्यांच्या आईने त्यांच्या लग्नासाठी स्थळ शोधण्यास सुरुवात केली. आईच्या आग्रहाखातर त्यांनी लग्नासाठी होकार दिला, त्यावेळी त्यांच्या आईच्या नजरेत डॉ. चारुलता आणि नेत्रतज्ञ डॉ. शरद कानडे यांची कन्या अमृता आल्या होत्या. अमृता यांचा फोटो पाहिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा नंबर घेतला आणि त्यानंतर त्यांच्या गाठीभेटी वाढल्या. कालातंराने दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांची पहिली भेट आणि त्यावेळी त्यांनी वापरलेली फिल्मी लाईन खूप खास आहे.

देवेंद्र फडणवीस आणि अमृता यांच्या पहिल्याच भेटीत फडणवीस त्यांना म्हणाले की, “तुम्ही काजोलसारख्या सारख्या दिसता, काजोल माझी फेव्हरेट आहे.” कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेणारे देवेंद्र फडणवीस त्याचवेळी अमृता यांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी त्यांना लग्नासाठी विचारून सांसारिक जीवन स्वीकारलं. देवेंद्र फडणवीस आणि अमृता यांची पहिली भेट त्यांचा कॉमन मित्र शैलेश जोगळेकरांच्या घरी झाली होती. लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचण्यापूर्वी एकमेकांनी काही अटी घातल्या होत्या. फडणवीसांनी अमृता यांना घातलेली अट अशी होती की, “मी एक रुपया पण तुला देणार नाही आणि मी तुझ्याकडून पण घेणार नाही. आयुष्यभर राजकारण करेन, नोकरी धंदा करणार नाही.” तर अमृता यांची अशी अट होती की, “निर्व्यसनी असेल तरच लग्न करेन.” देवेंद्रजींचं स्थळ माझ्या आईवडिलांना आवडलं होतं. तू तुझी नोकरी सुरु ठेव असं देवेंद्रजींनी मला सांगितलं. माझं राहणीमान आणि विचार राजकीय वातावरणाला मिळतेजुळते नव्हते. मात्र देवेंद्रजींना अशीच बायको हवी होती. दोघांनीही एकमेकांच्या अटी मान्य केल्या आणि आजतागायत पाळल्या.

हे ही वाचा:

घटस्फोटाची घोषणा करत HARDIK PANDYA यांनी केले चाहत्यांना आवाहन

Navi Mumbai NH 3: ॲक्सेस कंट्रोल मार्गामुळे शहरातून बाहेर पडण्यासाठी लागणार फक्त १५ मिनिटे, शहरांतर्गत वाहतूक आता होणार बंद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version