Thursday, July 4, 2024

Latest Posts

दीक्षाभूमी परिसरात भूमिगत पार्किंगवरून आंबेडकरी अनुयायी आक्रमक, Devendra Fadnavis यांनी स्थगितीची केली घोषणा

आंबेडकरी जनतेचा वाढता विरोध आणि रोष पाहता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधिमंडळात दीक्षाभूमीवरील पार्किंगच्या काम स्थगित देत असल्याची घोषणा केली.

नागपूरमधील दिक्षाभूमी परिसरात (Dikshabhumi) चालू असलेल्या भूमिगत पार्किंगच्या (Dikshabhumi Underground Parking Project) कामाला आंबेडकरी अनुयायांनी कडाडून विरोध केला. हजारो आंबेडकरी अनुयायांनी दीक्षाभूमी परिसरात जोरदार आंदोलन करत बांधकामास विरोध केला. याचे पडसाद महाराष्ट्र विधानसभेतदेखील (Maharashtra Vidhansabha) पडले असून आंबेडकरी जनतेचा वाढता विरोध आणि रोष पाहता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधिमंडळात दीक्षाभूमीवरील पार्किंगच्या काम स्थगित देत असल्याची घोषणा केली.

यावेळी विधिमंडळात (Maharashtra Assembly Monsoon Session 2024) बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “दीक्षाभूमी येथे विकासाचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यासाठी राज्य सरकारने २०० कोटी रुपयांची व्यवस्था केली होती. याचा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने सुचवल्याप्रमाणे तयार करण्यात आला आहे. त्यानुसार, भूमिगत पार्किंचे काम समरक समितीमार्फत हाती घेण्यात आले होते. मात्र लोकभावना लक्षात घेता त्याला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यावर एक बैठक घेऊन सर्वांच्या संमतीने निर्णय घेण्यात येईल. सर्वांचे मत विचारात घेऊनच त्यावर निर्णय घेण्यात येईल,” असे त्यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “दीक्षाभूमीला जे पार्किंगचे काम केले जात आहे. ते होऊ नये यासाठी आहे. हा आराखडा केला आहे. स्मारक समितीसोबत एक बैठक होईल. बैठक घेऊन पुढचे काम करण्यात येईल. अश्या वास्तुसंदर्भात वेगवेगळी मते असणे योग्य नाही. त्यामुळे एकमत झाल्यावर काम करू. स्मारक समितीने सांगितल्याप्रमाणे सरकारने निधी दिला व काम सुरु केले. आता चर्चेनंतर पुन्हा निर्णय घेऊ. त्यानंतरच काम सुरु केले जाईल,” असे ते म्हणाले.

नागपूरमधील दीक्षाभूमी परिसरात वेगवेगळ्या विकासकामांसाठी राज्य शासनाकडून २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार भूमिगत पार्किंगचेदेखील काम चालू होते. या प्रकल्पाला मात्र आंबेडकरी जनतेने कडाडून विरोध दर्शवला आहे. विजायादशमीच्या दिवशी दीक्षाभूमी यथे लाखो अनुयायी येतात. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे काम धोकादायक असल्याचे सांगत हे काम तात्काळ थांबवावे अशी मागणी आंदोलकांनी केली होती. आता या कामाला स्थगिती देण्यात आली असून इतर विकासकामांना आंदोलकांचा विरोध नसल्याचे समजते.

हे ही वाचा:

Maharashtra Monsoon Assembly 2024: ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार, Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा

Lonavala Bhushi Dam Tragedy: पावसाळ्यात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नेमक्या उपाययोजना काय?: Nana Patole

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss